AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lonavala Bhushi Dam : पाच जण वाहून गेल्यावर लोणावळ्याच्या भुशी डॅम परिसरात मोठी Action

Lonavala Bhushi Dam : दोन दिवसांपूर्वी लोणावळा भुशी डॅम परिसरात मोठी दुर्घटना घडली. एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. त्यानंतर प्रशानसाला खडबडून जाग आली आहे. त्यांनी कारवाई सुरु केली आहे. आठवड्यांच्या इतर दिवसांपेक्षा शनिवार-रविवार इथे जास्त गर्दी असते.

Lonavala Bhushi Dam : पाच जण वाहून गेल्यावर लोणावळ्याच्या भुशी डॅम परिसरात मोठी Action
bhushi damImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 02, 2024 | 11:52 AM
Share

लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. पावसाळ्यात लोणावळ्यातील भुशी डॅम परिसर नेहमीच पर्यटकांनी फुलून गेलेला असतो. आठवड्यांच्या इतर दिवसांपेक्षा शनिवार-रविवार इथे जास्त गर्दी असते. भुशी डॅम परिसरात असणाऱ्या धबधब्यावर भिजण्याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अन्सारी कुटुंब उतरलं होतं. यावेळी पाऊस कोसळत होता. अचानक धबधबा असलेल्या भागात पाण्याचा प्रवाह वाढला आणि अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेले. अन्सारी आणि सय्यद कुटुंब या ठिकाणी वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी आले होते.

या घटनेमुळे आनंद क्षणार्धात दु:खामध्ये बदलला. साहिस्ता लियाकत अन्सारी (36), मिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी (13), उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी (8), अदनान अन्सारी (4), मारिया अन्सारी (9) वाहून गेले. या दुर्घटनेनंतर प्रशासनला खडबडून जाग आली आहे. त्यांनी तातडीने पावल उचलली आहेत.

काय कारवाई?

लोणावळ्यातील पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या भुशी धरण परिसरातील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू झाली आहे. लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाकडून संयुक्त अतिक्रमण कारवाई सुरू आहे. भुशी धरण परिसरात चहा, नाष्टा, फेरीवाले, कणीस विक्रेते यांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे.

भुशी डॅम कोणाच्या मालकीच?

भुशी डॅम रेल्वेच्या मालकीचे असल्याने, त्यांनी स्थानिक प्रशासनाची मदत घेतली आहे. वर्षविहारासाठी पर्यटक पावसाळ्यात भुशी धरण परिसराला पसंती देतात. मात्र या ठिकाणी अतिक्रमणामुळे मोठी दाटी झाली होती. दोन दीवसापूर्वी घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली. याची गंभीर दखल घेऊन कारवाईला सुरुवात केली आहे. या कारवाईवेळी रेल्वे पोलीस दल आणि लोणावळा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.