AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amol Kolhe : कुणी काहीही म्हणो, सुप्रिया सुळेंचं काम बोलतं; अमोल कोल्हेंचा भाजपाला टोला

कुणी काहीही बोलले तरी काम बोलते. त्यामुळे फारसा फरक पडत नाही. जनता सूज्ञ आहे. मतदारांनी नेहमीच विश्वास दाखवला आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.

Amol Kolhe : कुणी काहीही म्हणो, सुप्रिया सुळेंचं काम बोलतं; अमोल कोल्हेंचा भाजपाला टोला
Image Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Sep 06, 2022 | 2:27 PM
Share

पुणे : 2024ला अजून खूप वेळ आहे. तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांचे काम बोलते. त्यामुळे बारामतीला कुणीही आले तरी काही फरक पडत नाही, असे मत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी व्यक्त केले आहे. गणपतीच्या आरतीनंतर टीव्ही 9ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी भाजपाला टोले लगावले. भाजपाने (BJP) बारामतीसाठीची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्षदेखील आज बारामतीत दाखल होत राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्यावर अमोल कोल्हे म्हणाले, की सुप्रिया सुळे या आमच्या खासदार आहेत. महासंसद पटूने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. ताईंची संसदेतील कामगिरी आम्हा सर्वांना प्रेरणा देणारी आहे. कुणी काहीही बोलले तरी काम बोलते. त्यामुळे फारसा फरक पडत नाही. जनता सूज्ञ आहे. मतदारांनी नेहमीच विश्वास दाखवला आहे, असे ते म्हणाले.

‘महाराष्ट्राच्या दृष्टीने मुंबई महत्त्वाची’

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या आर्थिक राजधानीच्या नाड्या आपल्या हातात राहाव्यात, असे प्रत्येक पक्षाला वाटते. त्यात भाजपाला वाटणेही स्वाभाविक आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने मुंबई अत्यंत महत्त्वाची आहे. येथील जनतेचे कल्याण व्हावे. त्यादृष्टीने कौलही महत्त्वाचा असेल, अशी प्रतिक्रिया अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर त्यांनी दिली आहे.

‘राज्यासमोर सध्या अनेक प्रश्न’

राज्यासमोर सध्या अनेक प्रश्न आहे. राजकारणापेक्षा येथील प्रश्नांकडे अधिक लक्ष दिले तर जास्त चांगले होईल, असे ते म्हणाले. दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात सध्या सामना सुरू आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. दसरा मेळावा कुणाचा आणि कुठे होणार यावर सध्या वाद सुरू आहे. मात्र या सर्व बाबी न्यायालयात प्रलंबित आहेत. परवानगी मिळाली नाही, तर शिवसेना न्यायालयात जाणार आहे.

‘सक्षम लोकशाहीसाठी सक्षम विरोधक गरजेचा’

राज्यात अनेक ठिकाणी दुपार पेरणीचे संकट आहे, पीकविम्याचा प्रश्न आहे, कांदा उत्पादकांच्या समस्या आहेत. याला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, शरद पवार विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यावर भाष्य करण्याऐवढा मी जाणकार तसेच मोठा नाही. पवारसाहेबांचा राष्ट्रीय राजकारणावरचा वकुब आपण सर्वच जाणतो. सक्षम लोकशाहीसाठी सक्षम विरोधक असणे गरजेचे असते. सत्ता निरंकुश झाल्यावर ती लोककल्याणाचे काम करीत नाही. त्यामुळे सत्तेवर अंकुश असणे आवश्यक आहे. त्यामुळे विरोधकांची मोट बांधणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

‘सणांमध्ये राजकारण नको’

आपला सण, उत्सव उत्साहाने साजरा करता येत आहे, ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येकासाठी आनंदाची बाब आहे. यात राजकारण यायला नको, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Follow Us
पद्मसिंह पाटलांच्या निर्दोष मुक्ततेनंतर मोठं घडणार; 8-10 दिवसांतच...
पद्मसिंह पाटलांच्या निर्दोष मुक्ततेनंतर मोठा निर्णय; 8-10 दिवसांतच... नातू मल्हार पाटलाने दिली सविस्तर माहिती
बापरे! थेट पूलच कोसळला, खडीने भरलेला ट्रक दरीत, पण ड्रायव्हर...
Video | बापरे! थेट पूलच कोसळला, खडीने भरलेला ट्रक दरीत, पण ड्रायव्हर...
लोकलचा दरवाजा बंद कर म्हणणं जीवावर बेतलं! 22 वर्षीय तरुणाची चाकूने....
मोठी बातमी! लोकलचा दरवाजा बंद कर म्हणणं जीवावर बेतलं! 22 वर्षीय तरुणाची चाकूने हत्या, नेमकं घडलं काय?
पेणमधील मुर्तीकारांची मेहनत पाण्यात! गणेशोत्सव काही महिन्यांवर असतानाच
पेणमधील मुर्तीकारांची मेहनत पाण्यात! गणेशोत्सव काही महिन्यांवर असतानाच भयंकर घडलं...
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! कुर्ला-सायनमध्ये पाण्यामुळे वाहतूक कोलम
Mumbai Rain Traffic | पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! कुर्ला-सायनमध्ये पाण्यामुळे वाहतूक कोलमडली
टीका, ट्रोलिंग अन् राजकीय गदारोळ; वाद वाढताच नार्वेकरांनी मागितली माफी
Rahul Narvekar | टीका, ट्रोलिंग अन् राजकीय गदारोळ; वाद वाढताच राहुल नार्वेकरांनी मागितली माफी, जे घडलं ते चुकीचं...
अखरे प्रकरण पेटलंच! रिक्षावाल्यांसारखं नार्वेकरांनाही मारायचं का?
अखरे प्रकरण पेटलंच! रिक्षावाल्यांसारखं नार्वेकरांनाही मारायचं का? बड्या नेत्याचं ते तुफान विधान चर्चेत
ते नार्वेकर नाही, नॉर्वेकर! राऊतांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल
Sanjay Raut UNCUT | ते नार्वेकर नाही, नॉर्वेकर! संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल, थेट पदावरून...
तर मी पेपरवेटच फेकून मारला असता; संजय राऊतांचं थेट विधानसभा अध्यक्ष...
Sanjay Raut | तर मी पेपरवेटच फेकून मारला असता; संजय राऊतांचं थेट विधानसभा अध्यक्षांबाबत खळबळजनक विधान
मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या...
CM Fadnavis | मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या आंदोलनानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार, नेमकं काय घडलं?