AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात पुन्हा वातावरण तापणार, 17 फेब्रुवारीपासून OBC आंदोलनाचा विजय वडेट्टीवार यांचा इशारा

येत्या 17 फेब्रुवारीला नागपुरात होणारे हे आंदोलन राजकीय नाही, ज्यांना यायचे आहे, त्यांनी यावे, कोणत्याही राजकीय बॅनरखाली ही मागणी केली जात नसल्याने कोणीही यात सहभागी होऊ शकतो असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

राज्यात पुन्हा वातावरण तापणार, 17 फेब्रुवारीपासून OBC आंदोलनाचा विजय वडेट्टीवार यांचा इशारा
विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते
| Updated on: Feb 08, 2026 | 7:53 PM
Share

सकल ओबीसी मोर्चातर्फे आणि वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी घेऊन आम्ही आरक्षणसाठी लढत आलेलो आहोत. जनगणना आणि यूजीसी संदर्भात ज्या गाईडलाईन्स आल्या आहेत. त्यावरुन विदर्भातील सगळ्या ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे. ओबीसीची जनगणना होत नसेल तर त्याचा आरक्षणावर परीणाम होऊ शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीतही अडचणी आहेत. ओबीसी आरक्षणाचा विषय राज्यभरात आता आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आणणार असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

येत्या 17 तारखेला नागपूरच्या संविधान चौकामध्ये यासाठी धरणे आंदोलन करून सुरुवात केली जाईल. जोपर्यंत ओबीसींचा जनगणनेत समावेश होत नाही. तोपर्यंत राज्यात सगळ्या नेत्यांनी मोठे आंदोलन केले पाहिजे. जिल्हा विभाग स्तरावर मोर्चे काढून ओबीसीच्या मागण्या काय आहेत सरकारच्या लक्षात आणून देऊ असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

ओबीसी युवा संमेलन

आम्ही मार्चच्या पहिल्या आठवड्यात ओबीसी युवा संमेलन घेणार आहोत. ओबीसींचे अधिकार यूजीसी सुधारणामुळे डावलण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ‘महा ज्योती’ असताना सुद्धा पैसे मिळत नाहीत. विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राष्ट्रीय ओबीसी आरक्षण

या आंदोलनासाठी सगळ्यांनी सहभागी व्हावे. तसेच सध्या सुरु असलेल्या जनगणनेत ओबीसींनी सहभागी होऊ नये साठी घरापुढे पाठी लावावी. ओबीसीच्या कॉलमचा जनगणनेत समावेश करावा. तरच आम्ही जनगणनेत सहभागी होऊ असे आवाहन मी ओबीसी जनतेला करत आहे असेही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

मंगळसूत्रामुळे परीक्षेत नाकारला…

विवाहित मुलींनी अभ्यास करूनही परीक्षा देऊ नये हे कोणते विचार आहेत. त्या महिलेला परीक्षेपासून वंचित ठेवले असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा लोकांना जोड्याने मारल पाहिजे. जो त्या अधिकाऱ्यांला जोड्यांना मारून येईल त्याला 25,000 हजाराचे बक्षीस देऊ असेही विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.