AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashadi Wari 2025: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यंदा उशिरा निघणार, काय आहे कारण?

Ashadi Wari 2025: 19 जून गुरुवारी नितीनियमानुसारची गुरुवार सोहळ्याची पालखी निघणार आहे. त्यानंतर आरती होणार आणि मग पंढरपूर पालखी प्रस्थान सोहळा सुरू होणार आहे.

Ashadi Wari 2025: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यंदा उशिरा निघणार, काय आहे कारण?
| Updated on: Jun 06, 2025 | 8:29 AM
Share

Ashadi Wari 2025: राज्यातील सर्व वारेकऱ्यांना आषाढी वारीचे वेध लागले आहेत. शेगाव येथून संत गजानन महाराज यांची पालखी निघाली आहे. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी 19 जून रोजी निघणार आहे. परंतु यंदा दरवर्षी चार वाजता सुरु होणारा पालखी सोहळा रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. पालखी सोहळा चार तास उशिराने सुरु होणार असल्याचे कारण विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे आणि रोहिणी पवार यांनी दिले आहे.

का होणार सोहळ्यास उशीर

विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे आणि रोहिणी पवार यांनी सांगितले की, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची वेळ यावर्षी पुढे ढकलण्यात आली आहे. कारण यंदा पालखी प्रस्थान सोहळ्याच्या दिवशीच गुरुवार आला आहे. रोजच्या नीतिनियमानुसार दर गुरुवारी माऊलींची पालखी निघते. त्याला गुरुवार सोहळा म्हणतात. म्हणजेच 19 जून गुरुवारी नितीनियमानुसारची गुरुवार सोहळ्याची पालखी निघणार आहे. त्यानंतर आरती होणार आणि मग पंढरपूर पालखी प्रस्थान सोहळा सुरू होणार आहे. यामुळे दरवर्षी दुपारी 4 वाजता सुरू होणारा प्रस्थान सोहळा रात्री 8 पर्यंत सुरू होणार आहे.

आषाढी वारीमुळे पालखी सोहळ्याबाबत साधकबाधक चर्चा झाली. वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून गुरुवारीची पालखी लवकर काढणार आहोत. तसेच सूर्यास्तापर्यंत ही पालखी संपवणार आहोत. सूर्यास्त झाल्यावर आरती होईल. त्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पंढरपूर पालखीचे प्रस्थान सोहळा चालू होईल. पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या बैठकीत वारकऱ्यांच्या सुख सुविचार दृष्टीने अनेक निर्णय झाले, असे विश्वस्त रोहिणी पवार यांनी सांगितले.

संत गजानन महाराज पालखी

बुलढाणा जिल्ह्यातील शेगावचे गजानन महाराज यांची पालखी आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी 2 जून रोजीच निघाली आहे. यंदा पालखीचे 56 वे वर्ष आहे. पालखी सोबत 700 वारकरी, टाळ मृदुंग, पताकाधारी चालणार आहे. एका महिन्यात 700 किमी पायी प्रवास करत पालखी पंढरपूरला पोहचणार आहे. आदिशक्ती मुक्ताची पालखी आषाढीवारी निमित्त 6 जून रोजी निघत आहे. ही पालखी 600 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

Follow Us
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद.....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद......
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन...
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन....