AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मशानात या जोडप्याने केले लग्न, स्मशानात लग्न करण्यामागे कारण आहे तरी काय?

Pune News : राज्यात झालेल्या एका आगळ्या वेगळ्या लग्नाची चर्चा सध्या सुरु आहे. हे लग्न कुठे झाले याचा विचारही तुम्हाला करता येणार नाही. हे लग्न स्मशानात झाले आहे. का घेतला त्यांनी स्मशानात लग्न करण्याचा निर्णय...

स्मशानात या जोडप्याने केले लग्न, स्मशानात लग्न करण्यामागे कारण आहे तरी काय?
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 25, 2023 | 3:17 PM
Share

अहमदनगर | 25 जुलै 2023 : प्रत्येकाला आपले लग्न आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्हावे, असे वाटत असते. काही जणांनी हवेत म्हणजेच विमानात लग्न केले आहे. काही जणांनी पाण्यावर लग्झरी क्रूझवर लग्न लावले आहे. त्यापेक्षा वेगळे लग्न अहमदनगर जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र झाली आहे. हे लग्न स्मशानभूमीत झाले आहे. नगर जिल्ह्यातील राहातामध्ये स्मशानभूमीत सनई चौघड्यांचे स्वर वाजले. मांडव टाकला गेला. गुरुजींच्या आवाजात मंगलाअष्टक झाली. अंधश्रद्धेला फाटा देत या जोडप्याने का केला स्मशानभूमीत विवाह.

का लावले असे लग्न

आपल्याकडे स्मशान शुभ मानले जात नाही. त्यामुळे कोणतेही शुभ कार्य त्या ठिकाणी होत नाही. परंतु गंगाधर गायकवाड यांनी आपल्या मुलीचा विवाह स्मशानत करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी लग्नाच्या सर्व पारंपारिक परंपरा करण्यात आला. धुमधडाक्यात हे लग्न झाले. शिक्षित युवक मनोज जयस्वाल याने गंगाधर गायकवाड याच्या या निर्णयास पाठिंबा दिला.

मयुरी अन् मनोज अडकले विवाह बंधनात

स्मशानभूमीमध्ये प्रत्येकाच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास असतो. परंतु मयुरी अन् मनोजने या ठिकाणी नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. मग स्मशानात मयुरी आणि मनोज यांच्या विवाहासाठी स्मशानभूमीतच मांडव टाकला गेला. सनई चौघाड्यांचा सुरात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचे कन्यादान माजी नगराध्यक्षा ममता पिपाडा अन् राजेंद्र पिपाडा यांनी केला.

का केले स्मशानभूमीत लग्न

गंगाधर गायकवाड हे गेल्या २० वर्षांपासून स्मशानभूमीत काम करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मुलीचे लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या माध्यमातून स्मशान अशुभ नसते, हा संदेश त्यांना द्यायचा होता.

मैत्रीचं रुपांतर प्रेमात

मयुरी आणि मनोज दोघेही शिर्डीत एकाच ठिकाणी होते. त्या ठिकाणी त्यांची मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. त्याला घरच्या मंडळींनी परवानगी दिली. अन् थाटामाटात विवाह झाला.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा