AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कर्नाटक निकालाचे दुरगामी परिणाम होणार नाहीत”; भाजपच्या नेत्याने काँग्रेसच्या विजयाचं विश्लेषण केलं

भाजपला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे कर्नाटकमधील या निवडणुकीत पराभव झाल्याचा सर्व बाजूने विचार केला जाईल असंही त्यानी यावेळी सांगितले आहे.

कर्नाटक निकालाचे दुरगामी परिणाम होणार नाहीत; भाजपच्या नेत्याने काँग्रेसच्या विजयाचं विश्लेषण केलं
| Updated on: May 13, 2023 | 7:40 PM
Share

इंदापूर : साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहिर झाला आणि काँग्रेसच्या विजयावर शिक्का मोर्तब झाला. कर्नाटक विधानसभेच्या निकालानतंर आता महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांकडूनही आगामी काळातील निवडणुकांबाबत विश्वास व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे आता भाजपच्या नेत्याने कर्नाटक राज्याने दिलेला कौल आपल्याला मान्य असल्याचे सांगत या निकालाचा आगामी काळातील कोणत्याही निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार नाही असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला आहे.

कर्नाटक राज्यात जरी काँग्रेसला विजय प्राप्त झाला असला तरी त्या निवडणुकीचा कोणताही परिणाम भाजपच्या राजकीय प्रवासावर होणार नाही.

मात्र कर्नाटकात आम्ही कुठे कमी पडलो, नेमका पराभव कसा झाला त्याचा आता विचार केला जाईल असंही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.

भाजपला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे कर्नाटकमधील या निवडणुकीत पराभव झाल्याचा सर्व बाजूने विचार केला जाईल असंही त्यानी यावेळी सांगितले आहे.

कर्नाटकमधील निवडणुकीमध्ये जो मतदारांना कौल दिला आहे, त्याबद्दल आम्ही कोणत्याही प्रकारचे दुमत व्यक्त केले नाही मात्र कर्नाटकच्या निवडणुकीत जनतेने जो कौल दिलेला कौल आम्ही मान्य करत.

भाजपच्या अपेक्षेपेक्षा कमी मतदान या निवडणूकीत झाले आहे त्याचं आत्मपरीक्षण केलं जाईल असं मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

या पराभवाला स्थानिक कारणंही असू शकतात. मात्र या निकालाचे कोणतेही दुरगामी परिणाम भारतीय जनता पार्टीवर होणार नाहीत.

याउलट येणाऱ्या प्रत्येक निवडणुका मोठ्या ताकदीने लढवल्या जातील आणि मतदारांचा भाजपवर असलेला विश्वास त्या निवडणुकांतून दिसून येईल असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.