AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कर्नाटकात संकट मोचकांचा फायदा झालेला नाही”; राष्ट्रवादीच्या नेत्याने गिरीश महाजन यांचं महत्व कमी केलं

कर्नाटकच्या निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन गेले होते, भाजपमध्ये गिरीश महाजन यांना संकट मोचक असं म्हटलं जातं. मात्र आमचे संकट मोचक त्या ठिकाणी जाऊनही त्यांना भाजपच्या जागा टिकवता आल्या नाहीत असा खोचक टोलाही एकनाथ खडसे यांनी त्यांना लगावला आहे.

कर्नाटकात संकट मोचकांचा फायदा झालेला नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याने गिरीश महाजन यांचं महत्व कमी केलं
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 13, 2023 | 6:40 PM
Share

जळगाव : कर्नाटकसारख्या राज्यात भाजपला जोरदार धक्का बसल्याने आता महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. कर्नाटक राज्याच्या निवडणुका जाहिर झाल्यापासून काँग्रेस आणि भाजप असा सामना रंगला होता. त्यामुळे आता निकाल लागल्यानंतर आता जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. या निकाला नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यानी भाजपवर सडकून टीका करत प्रचारयंत्रणेपासून ते अगदी नेतृत्वापर्यंत त्यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधताना त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची खिल्ली उडवली आहे.

आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वाकयुद्ध राज्याला माहिती आहे. त्यामुळे कर्नाटकच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील पक्षांकडून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

त्यातच जळगावमधून भाजपवर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानी भाजपच्या नेत्यांची त्यांच्या प्रचारावरून खिल्ली उडवली आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, कर्नाटकच्या निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन गेले होते, भाजपमध्ये गिरीश महाजन यांना संकट मोचक असं म्हटलं जातं. मात्र आमचे संकट मोचक त्या ठिकाणी जाऊनही त्यांना भाजपच्या जागा टिकवता आल्या नाहीत असा खोचक टोलाही एकनाथ खडसे यांनी त्यांना लगावला आहे.

त्यामुळे कर्नाटकात संकट मोचकांचा फायदा झालेला नाही अशा शब्दात त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर जहरी टीका केली आहे.

कर्नाटकातील निवडणुकीच्या निकालावरून असं दिसून येतं की, महाराष्ट्रात जर आजही निवडणुका झाल्या तर मात्र भाजपला या ठिकाणी महाराष्ट्रात प्रतिसाद मिळणार नाही आणि विरोधी पक्षाचेच सरकार महाराष्ट्रात येईल हे 100 टक्के खरं आहे असा विश्वासही त्यांनी एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.

एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेला गिरीश महाजन यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गिरीश महाजन यांनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, हे खरं आहे की कर्नाटक निवडणुकीसाठी मी गेलो होतो.

आणि त्यामुळेच 10 पैकी 5 जागा आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी 50 टक्केच विजय साजरा करावा असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

माझ्यावर टीका करण्यापेक्षा एकनाथ खडसे यांनी आधी तुम्ही मुक्ताईनगर पुरते बघा एक मार्केट कमिटी तुम्ही जिंकली तर तुम्ही पोकलँडवरुन मिरवणूक काढता, एक मुख्यमंत्र्याच्या लेव्हलचा माणूस एक मार्केट कमिटी जिंकली आणि पोकलँडवर चढून नाचून राहिला असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

या सर्व राजकारणावरून असं वाटत आहे की, एकनाथ खडसे यांचे आता जिल्ह्यात फारसं महत्व राहिलेलं नाही अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

एक मार्केट कमिटी घेतली तर त्यांना असं वाटते की पुरा महाराष्ट्रात जिंकला. त्यामुळे एकनाथ खडसे तुम्ही तब्बेतीला मानवेल तेवढचं करा असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय