AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; राष्ट्रीय महामार्गावरील ही दुसरी घटना…

सध्या या प्रकारे अपघात होऊन वन्य प्राणी दगावत असल्याने नागरिकांना प्राणीप्रेमी आणि पर्यावरप्रेमी संघटनेकडूनही  वारंवार आवाहन करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारचे अपघात वाढत असल्याने वन विभागाकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; राष्ट्रीय महामार्गावरील ही दुसरी घटना...
| Updated on: May 03, 2023 | 12:25 AM
Share

इंदापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात एक बिबट्याचा जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. पळसदेव काळेवाडी नंबर दोन नजीकजवळ ही दुर्घटना घडली आहे. दीड महिन्यापूर्वी ही महामार्गावरच यवतजवळही वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा बिबट्या ठार झाल्याने वन विभागाने वाहनधारकांना वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन केले आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील पळसदेव-काळेवाडी नंबर दोन येथे बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना रात्री उशीरा घडली आहे. रस्त्यावर अचानक बिबट्या आल्यानंतर वेगात असणाऱ्या अज्ञात वाहनाची त्याला धडक बसली.

बिबट्याला धडक बसल्यानंतर काही काळ तो जखमी अवस्थेत पडून आल्याचे प्रवाशांच्या लक्षात येताच या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली.

त्यानंतर फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबच्या सदस्य व वन विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र बिबट्या गंभीर जखमी झाल्यामुळे उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

महामार्गावर ही दुसरी घटना घडल्याने आता वन विभाग सतर्क झाला आहे.त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करताना वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडल्याने प्राणी प्रेमी आणि पर्यावरणप्रेमींतून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून नागरिकांना वाहन सावकाश चालवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या या प्रकारे अपघात होऊन वन्य प्राणी दगावत असल्याने नागरिकांना प्राणीप्रेमी आणि पर्यावरप्रेमी संघटनेकडूनही  वारंवार आवाहन करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारचे अपघात वाढत असल्याने वन विभागाकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.