AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांच्या प्रेमापोटी, कार्यकर्त्यांनी घेतला हा निर्णय; पदाधिकारी म्हणतात….

शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही धक्का बसला आहे. त्यांच्या या निर्णयामुळेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सध्या राजीनामा सत्र सुरुच ठेवले आहे.

शरद पवार यांच्या प्रेमापोटी, कार्यकर्त्यांनी घेतला हा निर्णय; पदाधिकारी म्हणतात....
| Updated on: May 02, 2023 | 11:49 PM
Share

चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर राज्यातील वातावरण प्रचंड ढवळून निघाले आहे. शरद पवार यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसह राज्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार जर आपल्या निर्णय मागे घेत नसतील तर आमचेही राजीनाने घ्या अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यासाठी भलीमोठी रांग लावली आहे.

शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे व्यथित होऊन चंद्रपूर जिल्ह्यातही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. शरद पवार यांच्या निवृत्तीमुळे आता राष्ट्रवादीती वातावरण प्रचंड तापले आहे.

त्यांच्या या निर्णमामुळे आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड या नेत्यांना आपले अश्रू अनावर झाले आहेत. त्यामुळे आता राज्यातील वेगवेगळ्या भागातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवा केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोमाणी यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

शरद पवार अध्यक्ष नसतील तर राष्ट्रवादी पक्षाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतील म्हणून त्यांनी राजीनामा परत घ्यावा अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.

शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही धक्का बसला आहे. त्यांच्या या निर्णयामुळेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सध्या राजीनामा सत्र सुरुच ठेवले आहे.

शरद पवार यांनी आज निवृत्तीची घोषणा केली असली तरी त्यांच्या या निर्णयाचे भविष्यात काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.