AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचा सामन्यापूर्वीच पाकिस्तानला धोबीपछाड, दुसऱ्या सामन्यात घडलं असं…

T20 World Cup 2026 Points Table: टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरू आहे. भारताने अमेरिकेनंतर दुबळ्या नामिबियालाही पराभवाचं पाणी पाजलं आहे. यासह गुणतालिकेत पाकिस्तान

टीम इंडियाचा सामन्यापूर्वीच पाकिस्तानला धोबीपछाड, दुसऱ्या सामन्यात घडलं असं...
टीम इंडियाचा सामन्यापूर्वीच पाकिस्तानला धोबीपछाड, दुसऱ्या सामन्यात घडलं असं...Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 12, 2026 | 10:37 PM
Share

ICC Men’s T20 World Cup 2026 Match Points Table: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना सुपर 8 फेरीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणारा संघ सुपर 8 फेरीत जागा पक्की करेल. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी आग्रही असतील. हा सामना श्रीलंकेच्या कोलंबोत होणार आहे. पाकिस्तान गेल्या दोन आठवड्यांपासून येथे आहे. त्यामुळे त्यांना या खेळपट्टीचा चांगला अंदाज आहे. त्यामुळे पाकिस्तानला कमी लेखून काही चालणार नाही. भारताला या सामन्यात चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.  असं असताना या सामन्यापूर्वी पाकिस्तान भारतीय संघाने दणका दिला आहे. कारण भारताने दुसरा सामना जिंकताच गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे.

गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, नेदरलँड, नामिबिया आणि अमेरिका हे संघ आहेत. भारत आणि पाकिस्तान यांनीच सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे सुपर 8 फेरीसाठी दावेदार आहेत. भारतीय संघ 4 गुण आणि +3.050 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तानने 2 पैकी 2 सामने जिंकून 4 गुण आणि +0.932 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर नेदरलँडचा संघ 2 पैकी एका सामन्यात विजयी मिळून 2 गुण आणि +0.356 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानी आहे. तर नामिबिया आणि अमेरिका यांनी सुरूवातीचे दोन्ही सामने गमवल्याने स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. आता नेदरलँड काही उलटफेर करते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

भारत नामिबिया सामना

नामिबिया विरूद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताने गमावला आणि प्रथम फलंदाजी आली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमवून 209 धावा केल्या. तसेच विजयासाठी 210 धावांचं आव्हान ठेवलं. पण नामिबियाचा संघ या धावांचा पाठलाग करताना गडबडला. सुरुवात चांगली होईल असं वाटलं होतं. पण तसं काही घडलं नाही. संपूर्ण सामन्यावर भारतीय संघाची पकड दिसली. नामिबियाचा संघ 18.2 षटकात सर्व गडी गमवून 116 धावा करू शकला. हा सामना भारताने 93 धावांनी जिंकला.

Follow Us
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार