AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil | घराघरात जा…आरक्षण समजून सांगा…मनोज जरांगे पाटील यांनी दिली त्रिसूत्र

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे निघालेले वादळ आता पुणे जिल्ह्यात आले. मनोज जरांगे पाटील यांची राजगुरुनगरमध्ये सभा झाली. त्यासभेत त्यांनी मराठा समाजास आंदोलनाचे तीन सूत्र सांगितले.

Manoj Jarange Patil | घराघरात जा...आरक्षण समजून सांगा...मनोज जरांगे पाटील यांनी दिली त्रिसूत्र
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 20, 2023 | 2:52 PM
Share

पुणे | 20 ऑक्टोंबर 2023 : मराठ्यांना आरक्षण मिळाले तर जल्लोष होईल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल, असा इशारा जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथून सरकाराला मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला होता. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची तोफ पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये धडाडली. लाखो तरुणांसमोर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा तरुणांचे बलिदान वाया जाऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले. या तरुणांच्या जीवन संपवण्यास फक्त सरकारच जबाबदार आहे. कारण सरकारने मराठा आरक्षण दिले असते तर त्या तरुणांना जीवन संपवावे लागले नसते.

आरक्षण समजून घेतले पाहिजे

मी एकदा शब्द दिला की बदलत नाही. आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही मागे फिरणार नाही. सरकारकडून मराठा समाजावर अन्याय झाला आहे. आता राज्यातील मराठा एक झाला आहे. आपण आतापर्यंत मोर्चे खूप काढले. सभा घेतल्या. परंतु आरक्षण समजून घेतले नाही. घराघरातील समाजास आरक्षण समजून घेणे गरजेचे होते. ज्यांना आरक्षण समजले त्यांनीही मराठ्यांना ते शिकवले नाही. ज्यांनी ज्यांनी आरक्षण समजून घेतले, ते नक्कीच आरक्षणात गेले. आपण फक्त बोंबलोत बसलो.

तो जीआर का फेटाळला

टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारने ३० दिवसांचा वेळ मागितला. आम्ही ४० दिवसांचा वेळ दिला. सरकारने मागितलेल्या पर्यायांवर हा वेळ दिला. त्यानंतर आणखी एक पर्याय दिला. सरकारचा १ जून २००४ रोजी जीआर आला आहे. त्यात मराठा आणि कुणबी एकच असल्याचा म्हटले आहे. त्या जीआरनुसार सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आम्ही केली. सरकारने नवीन जीआर काढला. त्यात असे म्हटले की, वंशवळीच्या नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. आपण हा जीआर नाकारला.

काय आहे त्रिसूत्र

मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण आंदोलनाचा पुढील टप्पा सांगत तीन सूत्र सांगितले. उद्यापासून प्रत्येक घराघरात जा. मराठा समाजास आरक्षण समजून सांगा. एकत्र का यायचे ते सांगा… अन् तिसरे सूत्र म्हणजे एकाने आत्महत्या करायची नाही. उद्रेक करायचे नाही. जाळपोळ करायची नाही. मराठा समाजाच्या शांततेच्या आंदोलनाने त्यांना जेरीस आणले आहे. उद्रेक केल्यावर काय होते आपल्यावर गुन्हे दाखल होतात. त्यानंतर आपल्या तरुणांना नोकरी मिळत नाही. यामुळे शांततेचा मार्ग आपला आहे. सरकार २४ तारखेच्या आत मराठा समाजास आरक्षण देईल, अशी अपेक्षा मला आहे.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर