AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांचं सर्वात मोठं विधान; म्हणाले, राम मंदिर झाल्यानंतर…

NCP Leader Sharad Pawar on Loksabha Election 2024 : लोकसभेचा निकाल हा भाजपसाठी धक्कादायक होता. या निकालावर शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. राम मंदिराच्या उभारणीचा दाखला देत शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार काय म्हणाले? वाचा सविस्तर...

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांचं सर्वात मोठं विधान; म्हणाले, राम मंदिर झाल्यानंतर...
शरद पवार
| Updated on: Jun 11, 2024 | 6:50 PM
Share

लोकसभा निवडणुकीचा निकाल हा भाजपला धक्का देणारा ठरला. यात भाजपला अपेक्षित यश आलं नाही. तर इंडिया आघाडीने उसंडी मारल्याचं दिसलं. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. यंदा 300 चा आकडा 240 वर आला. 60 जागा कमी झाल्या. उत्तर प्रदेशमध्ये लोकांनी वेगळा कौल दिला. मला असं वाटत होतं की, देशात राम मंदिर झाल्यानंतर निवडणुकीचा प्रचार त्यानुसार होईल आणि उत्तर प्रदेशचे जनता मतदान करेल. मंदिराच्या नावावर मतदान मागितलं. म्हणून लोकांनी वेगळा निकाल दिला. मंदिर अयोध्येत बांधलं पण तिथंच भाजपचा उमेदवार पडला. देशाची लोकशाही माणसांच्या शहाणपणामुळे टिकली आहे, असं शरद पवार म्हणाले. ते बारामतीत बोलत होते.

लोकसभेच्या निकालावर भाष्य

लोकसभा निवडणूक आता झाली आहे,आणि आता ही निवडणूक झाल्यानंतर राज्यातील जनतेचे आभार मानले पाहिजे. त्यांनी वेगळा निकाल दिला. देशात देखील वेगळा निकाल आला. गेली 10 वर्ष सत्ता मोदी साहेबांकडे आहे आणि त्याचा परिणाम या निकालात दिसला. वेगळा निकाल लागला. सरकार बनलं, मंत्रिमंडळ स्थापन झालं आता अशी अपेक्षा करू की देशात आता स्थिरता येईल, त्याची देशाला गरज आहे. निवडणूक येयील आणि जातील देश आर्थिक मजबूत झाला आहे, असं शरद पवार म्हणाले.

दुष्काळी दौऱ्याची घोषणा

आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. मी कालपासून बारामतीमध्ये आहे आणि या तीन दिवसांत मी अनेक ठिकाणी जाणार आहे. त्याचा उद्देश आहे की दुष्काळी दौरा आहे माझा एक अनुभव आहे. मी ज्यावेळी दुष्काळी दौऱ्याला निघतो. त्यावेळी पाऊस सुरू होतो आणि आजही पाऊस झाला, असं म्हणत शरद पवार यांनी दुष्काळी दौऱ्याची घोषणा केली आहे.

यंदा राज्यात आणि देशात चांगला पाऊस होणार आहे. राज्यात साखरेच उत्पन्न दोन नंबरला राहतं. पण यंदा आपलं राज्य एक नंबरला गेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये यंदा साखरेच उत्पन्न कमी झालं आहे, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.