AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांचं सर्वात मोठं विधान; म्हणाले, राम मंदिर झाल्यानंतर…

NCP Leader Sharad Pawar on Loksabha Election 2024 : लोकसभेचा निकाल हा भाजपसाठी धक्कादायक होता. या निकालावर शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. राम मंदिराच्या उभारणीचा दाखला देत शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार काय म्हणाले? वाचा सविस्तर...

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांचं सर्वात मोठं विधान; म्हणाले, राम मंदिर झाल्यानंतर...
शरद पवार
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 11, 2024 | 6:50 PM
Share

लोकसभा निवडणुकीचा निकाल हा भाजपला धक्का देणारा ठरला. यात भाजपला अपेक्षित यश आलं नाही. तर इंडिया आघाडीने उसंडी मारल्याचं दिसलं. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. यंदा 300 चा आकडा 240 वर आला. 60 जागा कमी झाल्या. उत्तर प्रदेशमध्ये लोकांनी वेगळा कौल दिला. मला असं वाटत होतं की, देशात राम मंदिर झाल्यानंतर निवडणुकीचा प्रचार त्यानुसार होईल आणि उत्तर प्रदेशचे जनता मतदान करेल. मंदिराच्या नावावर मतदान मागितलं. म्हणून लोकांनी वेगळा निकाल दिला. मंदिर अयोध्येत बांधलं पण तिथंच भाजपचा उमेदवार पडला. देशाची लोकशाही माणसांच्या शहाणपणामुळे टिकली आहे, असं शरद पवार म्हणाले. ते बारामतीत बोलत होते.

लोकसभेच्या निकालावर भाष्य

लोकसभा निवडणूक आता झाली आहे,आणि आता ही निवडणूक झाल्यानंतर राज्यातील जनतेचे आभार मानले पाहिजे. त्यांनी वेगळा निकाल दिला. देशात देखील वेगळा निकाल आला. गेली 10 वर्ष सत्ता मोदी साहेबांकडे आहे आणि त्याचा परिणाम या निकालात दिसला. वेगळा निकाल लागला. सरकार बनलं, मंत्रिमंडळ स्थापन झालं आता अशी अपेक्षा करू की देशात आता स्थिरता येईल, त्याची देशाला गरज आहे. निवडणूक येयील आणि जातील देश आर्थिक मजबूत झाला आहे, असं शरद पवार म्हणाले.

दुष्काळी दौऱ्याची घोषणा

आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. मी कालपासून बारामतीमध्ये आहे आणि या तीन दिवसांत मी अनेक ठिकाणी जाणार आहे. त्याचा उद्देश आहे की दुष्काळी दौरा आहे माझा एक अनुभव आहे. मी ज्यावेळी दुष्काळी दौऱ्याला निघतो. त्यावेळी पाऊस सुरू होतो आणि आजही पाऊस झाला, असं म्हणत शरद पवार यांनी दुष्काळी दौऱ्याची घोषणा केली आहे.

यंदा राज्यात आणि देशात चांगला पाऊस होणार आहे. राज्यात साखरेच उत्पन्न दोन नंबरला राहतं. पण यंदा आपलं राज्य एक नंबरला गेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये यंदा साखरेच उत्पन्न कमी झालं आहे, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

Follow Us
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय; तुमच्या खिशावर काय परिणाम?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरे संतापले
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरेंनी काँग्रेसला सुनावले खडेबोल
35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी..
Sanjay Raut | 35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी संजय राऊतांची मिश्किल टोलेबाजी!
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
CJP | मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी बैठक; मोठा निर्णय होणार?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! खांदेपालटचा इशारा
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! त्या मंत्र्यांना घरी पाठवणार? खांदेपालटचा इशारा
मन हेलावणारी बातमी! बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मन हेलावणारी बातमी! लगान ते गजनी... बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...