AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Ganeshotsav : वाहतुकीत बदल केल्याचा पीएमपीला फटका, दरदिवशी होतंय 20 ते 22 लाखांचं नुकसान

दगडूशेठ गणपतीसह मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी इतर जिल्ह्यांतूनदेखील नागरिक पुण्यात येतात. त्यांच्यासाठी कॅब किंवा पीएमपी हा पर्याय सहज उपलब्ध होणार असतो. मात्र आता अशा नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

Pune Ganeshotsav : वाहतुकीत बदल केल्याचा पीएमपीला फटका, दरदिवशी होतंय 20 ते 22 लाखांचं नुकसान
पीएमपीएमएल संग्रहित छायाचित्रImage Credit source: Wiki
| Updated on: Sep 04, 2022 | 10:10 AM
Share

पुणे : गणेशोत्सवामुळे (Pune Ganeshotsav) पुणे पोलिसांनी वाहतुकीत बदल केल्याने पीएमपीएमएलला मोठा फटका बसला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक बंदीमुळे (Main road closed) पीएमपीएमएलच्या 250 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सुमारे सव्वा दोन लाख प्रवाशांना याचा फटका बसला आहे. तर पीएमपीएमएलचे (PMPML) दर दिवशी 20 ते 22 लाखांचे नुकसान यामुळे होणार आहे. पुण्यातील शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता यासह इतर काही महत्त्वांच्या मार्गांवरील या रस्त्यावरील वाहतूक गणेशोत्सवामुळे आहे बंद. त्यामुळे पर्यायाने पीएमपीच्या बसेसही या रस्त्यांवरून धावणार नाहीत. दुसरीकडे पीएमपीएमएल प्रशासनाने सुरू केलेल्या रात्रीच्या बससेवेलाही प्रतिसाद नाहीच. त्यामुळे दुहेरी नुकसान सोसावे लागत आहे. रस्ते बंद आणि ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याने दिसून येत आहे.

कॅब सेवेवरही परिणाम

कॅबच्या सेवेवरदेखील रस्ते बंद करण्याच्या निर्णयाचा फटका बसला आहे. व्यवसायावर सुमारे 30 टक्के परिणाम झाला आहे. ठिकठिकाणी केलेल्या बॅरिकेडिंगमुळे वाहनांना प्रवेश नाही. त्यामुळे प्रवाशांनी कॅब बुक केली तरी ती प्रवाशांपर्यंत पोहोचतच नाही. याचा फटका कॅबसह प्रवाशांनाही बसत आहे.

दुपारपासूनच रस्ते बंद

कॅबचे बुकिंगही ऐनवेळी रद्द केले जात आहे. त्यामुळे कॅबही नाही आणि पीएमपीही नाही, अशी अवस्था प्रवाशांची झाली आहे. गणेशोत्सवाचा उत्साह ठिकठिकाणी दिसून येत आहे. देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे दुपारपासूनच रस्ते बंद करण्यास वाहतूक पोलिसांनी सुरवात केली आहे. विविध वस्तुंच्या खरेदीसाठी नागरिक पेठांच्या तसेच तुळशीबाग याठिकाणी येत असतात.

नागरिकांची मोठी गैरसोय

दगडूशेठ गणपतीसह मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी इतर जिल्ह्यांतूनदेखील नागरिक पुण्यात येतात. त्यांच्यासाठी कॅब किंवा पीएमपी हा पर्याय सहज उपलब्ध होणार असतो. मात्र आता अशा नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

गौरींच्या विसर्जनानंतर प्रवाशांमध्ये वाढ होण्याची शक्यता

गणेशभक्तांसाठी पीएमपीएमएलने रात्री 10 ते 2 या दरम्यान बससेवा सुरू केली आहे. अद्याप ही सेवा चांगल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहे. गौरींच्या विसर्जनानंतर प्रवाशांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रात्रीच्या बस सेवेसाठी पीएमपीने 160हून अधिक बस उपलब्ध केल्या आहेत. या बस वाढवल्या जाणार आहेत.

हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.