AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड?”; गोपीचंद पडळकर यांनाच विचारला गेला सवाल…

माजी सैनिक स्वर्गीय सूर्यकांत लालाजी पवार यांनी भारतीय सैन्यात देशसेवा केली. व 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात देखील ते सहभागी झाले.

आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड?; गोपीचंद पडळकर यांनाच विचारला गेला सवाल...
| Updated on: Mar 29, 2023 | 11:40 PM
Share

पुणेः भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सातत्याने शरद पवार, अजित पवार आणि रोहित पवार यांच्यावर टीका केली जाते. गोपीचंद पडळकर यांच्याकडून टीका होत असताना अनेकदा त्यांनी आक्षेपार्ह विधानही केली आहे. त्यामुळे पडळकर यांच्या टीकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापलेले असते. दोन दिवसापूर्वी गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड असल्याचे वादग्रस्त वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले होते.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता पुण्यात गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आता बॅनरबाजी करून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविरोधात टीका केल्यानंतर आता गोपीचंद पडळकर यांच्याविरोधातही पोस्टरबाजी करून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

माजी सैनिक स्वर्गीय सूर्यकांत लालाजी पवार यांनी भारतीय सैन्यात देशसेवा केली. व 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात देखील ते सहभागी झाले.

देशासाठी प्राण हातावर घेऊन लढणारे आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड ? आमदार गोपीचंद पडळकर आम्ही तुम्हाला माफ करू शकणार नाही असा इशारा सूर्यकांत लालाजी पवार यांच्या मुलाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता भविष्यात हा वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. तर गोपीचंद पडळकर यांनी कालही आणि आजही त्यांनी पवार कुटुंबीयावर जोरदार हल्लाबोल केला होता.

तर आता मात्र या पोस्टरबाजीतून एका सैनिकाच्या मुलग्याने पडळकरांचा निषेध व्यक्त करत आम्ही तुम्हाला कधीही माफ करून शकणार नाही असा इशारा दिला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.