AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे शहरातील स्टार्टअपने बनवली स्मार्ट सिग्नल प्राणाली, वाहतूक कोंडीतून मिळाला दिलासा

Pune News : पुणे शहरात वाहनांची संख्या सर्वात जास्त आहे. यामुळे वाहतूक कोंडीही सतत होत असते. आता सिग्नलवर होणाऱ्या वाहतूक कोडींतून उपाय काढला गेला आहे. पुणे शहरातील स्टार्टअपने यासाठी स्मार्ट सिग्नल यंत्रणा विकसित केली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली आहे.

पुणे शहरातील स्टार्टअपने बनवली स्मार्ट सिग्नल प्राणाली, वाहतूक कोंडीतून मिळाला दिलासा
| Updated on: May 03, 2023 | 3:47 PM
Share

रणजित जाधव, पिंपरी चिंचवड : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक म्हणजे मोठे दिव्यच असते. चार ते पाच किलोमीटर प्रवास करण्यासाठी अनेकदा तासभर वेळ जातो. चौकाचौकात असणारे सिग्नल आणि वाहनांची संख्या यामुळे वाहतुकीची कोंडी होते. अनेकवेळी सिग्नलवर बराच वेळ थांबावे लागते. अगदी समोर काहीच वाहने नसताना दुसरीकडे लाल सिग्नल असतो. यामुळे एका बाजूची वाहतूक खोळबंली जाते. त्यावर पुणे शहरातील स्टार्टअपने उपाय काढला आहे. यासाठी स्मार्ट सिग्नल प्रणाली बनवली आहे.

काय आहे प्रणाली

पिंपरीकडून हिंजवडीकडे जायचं म्हणजे एक दिव्य याची प्रचिती नेहमीच येते. या भागात आयटी कंपन्यांची संख्या मोठी आहे. यामुळे या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीचा नेहमी सामना करावा लागतो. वाकडच्या मुख्य चौकात तर कितीतरी वेळा वाहतूक कोंडीचे चित्र दिसते. पण आता मात्र या चौकात सिग्नलच स्मार्ट झाले आहेत. या चौकात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट इंटेलिजंट सिग्नल सिस्टीम बसवण्यात आली आहे. ही सिस्टीम कॅमेरा आणि सर्वांनी नियंत्रित होते. ज्या लेनवर गाड्यांची संख्या अधिक आहे ते सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व्हरला कळवले जाते. त्यानंतर सर्व्हेर सिग्नलचा कालावधी त्यानुसार बदलतो आणि वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होते.

ग्रीन कॅरोडोरची निर्मिती

स्मार्ट सिग्नल बनवताना रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांचा विचार करण्यात आला आहे. म्हणजे रुग्णावाहिका आली तर सिग्नल त्वरीत ग्रीन होतो, रुग्णवाहिका गेल्यावर पुन्हा त्याचे पूर्वीप्रमाणे काम सुरु होते. या स्मार्ट सिग्नल यंत्रणेमुळे या चौकात ७० टक्क्यांहून अधिक सकारात्मक परिणाम दिसत आहे.

रियल टाईममध्ये व्यवस्थापन

रियल टाईममध्ये सिग्नल व्यवस्थापन केलं जातं. जिथं ट्राफिक जास्त तिथं सिग्नल जास्त वेळ खुला असतो. यामुळे वाहतूक कोंडी कमी होते. ७० ते ८० टक्के वाहतूक कोंडी कमी झाली आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.