AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाची बातमी: पुण्यातून देशातील 21 शहरांसाठी विमानसेवा; 20 ऑगस्टपासून प्रारंभ

Pune Air Service | दुसरीकडे कोल्हापूर ते नागपूर या विमानसेवेचाही प्रारंभ होणार आहे. याशिवाय, कोल्हापूर ते अहमदाबाद ही विमानसेवाही लवकरच सुरु होईल. आठवड्यातून तीनवेळा कोल्हापुरहून अहमदाबादसाठी विमान सुटेल. या विमानसेवांसाठीच्या ऑनलाईन बुकिंगलाही सुरुवात झाली आहे.

आनंदाची बातमी: पुण्यातून देशातील 21 शहरांसाठी विमानसेवा; 20 ऑगस्टपासून प्रारंभ
पुणे विमानतळ
| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 10:53 AM
Share

पुणे: पुण्यातून आता देशातील 21 शहरांसाठी विमान सेवा सुरु होणार आहे. इंडिगो या विमान वाहतूक कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार दर सोमवारी आणि शुक्रवारी पुण्याहून अमृतसरसाठी विमान सुटेल. अमृतसरसाठी 20ऑगस्टपासून तर रांची आणि तिरुअनंतपुरमसाठी 21 ऑगस्टपासून पुण्यातील लोहगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल.

तर दुसरीकडे कोल्हापूर ते नागपूर या विमानसेवेचाही प्रारंभ होणार आहे. याशिवाय, कोल्हापूर ते अहमदाबाद ही विमानसेवाही लवकरच सुरु होईल. आठवड्यातून तीनवेळा कोल्हापुरहून अहमदाबादसाठी विमान सुटेल. या विमानसेवांसाठीच्या ऑनलाईन बुकिंगलाही सुरुवात झाली आहे.

नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा

नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा आता दररोज उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही विमानसेवा सुरु व्हावी म्हणून भरपूर प्रयत्न केले होते. अखेर चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. (Nanded to Mumbai Ahmedabad jalgaon daily flight, Minister Ashok Chavan efforts)

नांदेबरोबरच जळगाव आणि अहमदाबादला ये-जा करण्यासाठी नव्याने विमानसेवा सुरू होणार आहे. नांदेड ते मुंबई विमान सेवा आठवड्यातून चारच दिवस होती, मात्र पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेऊन ही विमानसेवा दररोज उपलब्ध करून दिलीय.

या जिल्ह्यांना विमानसेवेचा फायदा

नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा सुरु झाल्याने नांदेडसह शेजारच्या हिंगोली, परभणी, यवतमाळ आणि लातूर जिल्ह्यातील प्रवाश्यांना या सेवेचा भरपूर मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

या अगोदर टू जेटची आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरु होती. ही विमानसेवा तूर्तास तशीच राहणार असून बाकी राहिलेल्या चार दिवसांत टु जेटचे विमान सकाळी पावणे दहा वाजता अहमदाबादवरुन निघेल. ते विमान अकरा वाजता जळगावला पोहोचेल आणि साडे अकरा वाजता तेच विमान जळगाववरुन निघून पावणे एक वाजता मुंबईत पोहोचेल.

विमानाचं टाईमटेबल…

मुंबईतून 1 वाजून 25 मिनिटांनी निघणारं विमान नांदेडमध्ये तीन वाजता येईल. साडे तीन वाजता हे विमान परत एकदा मुंबईच्या दिशेने प्रयाण करेल तेच विमान मुंबई विमानतळावरुन पोहोचून साडे पाच वाजता जळगावच्या दिशेने प्रयाण करेल. त्यानंतर 7 वाजून 5 मिनिटांनी जळगाववरुन निघून रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी हे विमान अहमदाबादला पोहोचेल.

नांदेडकरांनी मानले अशोक चव्हाण यांचे आभार

नव्याने सुरु होणाऱ्या विमानसेवेने दररोज मुंबईला जाण्यासाठी नागरिकांना आता आठ ते दहा तासांचा प्रवास करावा लागणार नाही. जर मुंबईत कोणतंही शासकीय काम असेल वा खासगी काम असे तर अगदी दोन तासांत नांदेडवरुन व्यक्ती मुंबईत येऊ शकतात. पाकलमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरु झालेली विमानसेवेने नागरिक सुखावले आहे. समस्त नांदेडकरांनी चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.