AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News : वीज चोरीचा असा प्रकार पहिलाच नसणार, तब्बल ६७ वर्षांपासून सुरु आहे वीजचोरी

Pune News : राज्यातील शहरी अन् ग्रामीण भागात वीज पुरवठा आणि वीज बिल वसुली करण्याचे काम महावितरणकडून करण्यात येते. परंतु महावितरण कंपनीत वीज गळती अन् वीज चोरीचे प्रमाण मोठे आहे. आता धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Pune News : वीज चोरीचा असा प्रकार पहिलाच नसणार, तब्बल ६७ वर्षांपासून सुरु आहे वीजचोरी
mahavitaran
| Updated on: Aug 05, 2023 | 1:12 PM
Share

सुनिल थिगळे, पुणे | 5 ऑगस्ट 2023 : महावितरण कंपनीकडून वीजचोरी रोखण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु असतात. वीज चोरीला आळा बसावा, यासाठी महावितरणचे भरारी पथक असते. या पथकाकडून वीजचोरी विरुद्ध नियमित मोठ्या मोहिमा राबविण्यात येतात. तसेच ‘वीजचोरी कळवा अन् बक्षीस मिळवा’ ही योजनाही राबवली जाते. त्यानंतर महावितरणची वीज चोरी कमी झालेली नाही. अनेक ठिकाणी वीज चोरी अन् वीज गळती सुरु असते. परंतु आता वीज चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला. सरकारी कार्यालयाकडून तब्बल ६७ वर्षांपासून वीज चोरी केली जात होती.

काय आहे प्रकार

पुणे जिल्ह्यात दीर्घ कालावधीपर्यंत वीज चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. १९५६ पासून वीज चोरी होत असताना महावितरणला माहितीच नाही. विशेष म्हणजे ही चोरी एका सरकारी कार्यालयाकडून केली जात होती. म्हणजेच चक्क ग्रामपंचायत कार्यालय अनेक वर्षांपासून वीज चोरी करत होते. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली.

कुठे झाला प्रकार

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील आंधळगाव ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला आहे. ही ग्रामपंचायत सन १९५६ साली निर्माण झाली होती. परंतु आंधळगाव ग्रामपंचायत कार्यालयाने आजपर्यंत कोणतेही अधिकृत वीज कनेक्शन घेतले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये अनधिकृत वीज पुरवठा सुरु आहे. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांना अजूनपर्यंत हे लक्षात आले नाही. महावितरणकडून विजचोरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. परंतु आता सरकारी कार्यालय असलेल्या ग्रामपंचायतीने हा प्रकार केला आहे. यामुळे महावितरण कोणाविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करणार? आता हा प्रश्न आहे.

लक्षात कसे आले नाही

तब्बल ६७ वर्ष अनधिकृत कनेक्शन असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांना लक्षात कसे आले नाही? एखाद्या सरकारी कार्यालयाने अधिकृत कनेक्शन घेऊन रितसर वीज बिल भरू नये, याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामपंचायतीमध्ये १९५६ पासून किती ग्रामसेवक आली असतील, एकानेही यासंदर्भात नियमाचे पालन केले नाही, असे दिसून येत आहे.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.