AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News : वीज चोरीचा असा प्रकार पहिलाच नसणार, तब्बल ६७ वर्षांपासून सुरु आहे वीजचोरी

Pune News : राज्यातील शहरी अन् ग्रामीण भागात वीज पुरवठा आणि वीज बिल वसुली करण्याचे काम महावितरणकडून करण्यात येते. परंतु महावितरण कंपनीत वीज गळती अन् वीज चोरीचे प्रमाण मोठे आहे. आता धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Pune News : वीज चोरीचा असा प्रकार पहिलाच नसणार, तब्बल ६७ वर्षांपासून सुरु आहे वीजचोरी
mahavitaran
| Updated on: Aug 05, 2023 | 1:12 PM
Share

सुनिल थिगळे, पुणे | 5 ऑगस्ट 2023 : महावितरण कंपनीकडून वीजचोरी रोखण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु असतात. वीज चोरीला आळा बसावा, यासाठी महावितरणचे भरारी पथक असते. या पथकाकडून वीजचोरी विरुद्ध नियमित मोठ्या मोहिमा राबविण्यात येतात. तसेच ‘वीजचोरी कळवा अन् बक्षीस मिळवा’ ही योजनाही राबवली जाते. त्यानंतर महावितरणची वीज चोरी कमी झालेली नाही. अनेक ठिकाणी वीज चोरी अन् वीज गळती सुरु असते. परंतु आता वीज चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला. सरकारी कार्यालयाकडून तब्बल ६७ वर्षांपासून वीज चोरी केली जात होती.

काय आहे प्रकार

पुणे जिल्ह्यात दीर्घ कालावधीपर्यंत वीज चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. १९५६ पासून वीज चोरी होत असताना महावितरणला माहितीच नाही. विशेष म्हणजे ही चोरी एका सरकारी कार्यालयाकडून केली जात होती. म्हणजेच चक्क ग्रामपंचायत कार्यालय अनेक वर्षांपासून वीज चोरी करत होते. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली.

कुठे झाला प्रकार

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील आंधळगाव ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला आहे. ही ग्रामपंचायत सन १९५६ साली निर्माण झाली होती. परंतु आंधळगाव ग्रामपंचायत कार्यालयाने आजपर्यंत कोणतेही अधिकृत वीज कनेक्शन घेतले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये अनधिकृत वीज पुरवठा सुरु आहे. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांना अजूनपर्यंत हे लक्षात आले नाही. महावितरणकडून विजचोरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. परंतु आता सरकारी कार्यालय असलेल्या ग्रामपंचायतीने हा प्रकार केला आहे. यामुळे महावितरण कोणाविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करणार? आता हा प्रश्न आहे.

लक्षात कसे आले नाही

तब्बल ६७ वर्ष अनधिकृत कनेक्शन असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांना लक्षात कसे आले नाही? एखाद्या सरकारी कार्यालयाने अधिकृत कनेक्शन घेऊन रितसर वीज बिल भरू नये, याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामपंचायतीमध्ये १९५६ पासून किती ग्रामसेवक आली असतील, एकानेही यासंदर्भात नियमाचे पालन केले नाही, असे दिसून येत आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.