AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन कोटींच्या सोन्याच्या हव्यासापोटी आधी मित्राचा केला खून, त्यानंतर मृतदेह पुरला शेतात, असा उघड झाला प्रकार

विजय घरुन दागिने व रोकड घेऊन निघाल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले होते. मग पोलिसांनी नितीन व विजयची चौकशी केली. त्यांना पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी खून केल्याची कबुली देत घटनाक्रम सांगितला.

दोन कोटींच्या सोन्याच्या हव्यासापोटी आधी मित्राचा केला खून, त्यानंतर मृतदेह पुरला शेतात, असा उघड झाला प्रकार
Image Credit source: Google
| Updated on: Jan 30, 2023 | 9:01 AM
Share

पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune Crime News) वेल्हे तालुक्यात काही दिवसांपूर्वी एक खून झाला होता. हा खून शिवीगाळ केल्याच्या रागातून दोन भावांनी केल्याचे आधी सांगितले जात होते. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून सोने-चांदीच्या हव्यासापोटी हा खून झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी १ कोटी ८३ लाख ७६ हजाराचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कमेचा मुद्देमाल जप्त केला आहे.

काय होता प्रकार

विजय प्रफुल्ल काळोखे (वय ३८, रा. आप्पा बळवंत चौक पुणे) यांची आंबी (ता. हवेली) येथे निघृण हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. ते घरुन तब्बल १ कोटी ८३ लाख रुपयांच्या सोन्या-चांदीचे दागिने व रोकड घेऊन गेले होते. विजय याचे मित्र विजय निवंगुणे आणि नितीन निवंगुणे यांना हे कळाले. त्याने कात्रज येथील संतोषनगर येथे स्टिलच्या चिमटयाने विजय  काळोखे याच्या डोक्यात आणि तोंडावर वार केला. त्यात विजयचा मृत्यू झाला. त्यानंतर विजयचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅरलमध्ये टाकला. हा बॅरल कारमध्ये टाकून तो मौजे रानवडी येथे नितीन निवंगुणे याच्या शेतजमिनीत पुरला.

पोलीस चौकशीत झाला प्रकार उघड

विजय घरुन दागिने व रोकड घेऊन निघाल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले होते. मग पोलिसांनी नितीन व विजयची चौकशी केली. चौकशीत उडवाउडवीची उत्तरे ते देऊ लागले. यामुळे पोलिसींनी त्याला खाक्या दाखवताच त्यांनी खून केल्याची कबुली देत घटनाक्रम सांगितला. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी नितीन रामभाऊ निवांगूने, विजय दत्तात्रय निवंगुने,ओंकार नितीन निवांगुणे आणि आणखी एक अशा चार जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी जप्त केला ऐवज

आरोपी ओंकार नितीन निवंगुणे त्याच्याकडून १ कोटी ५६ हजार किमतीचे एकूण २७४३ ग्राम १२० मि.ली. वजनाची सोन्याची विट व दागीने तसेच २९ ग्रॅम ६८० मिली वजनाचे चांदीचे दागीने  व रोकड असा एकूण १ कोही ८३ हजार ७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.