Ramdas Athwale : शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा तर त्याआधी ठाकरेंनी भाजपाचा केला होता करेक्ट कार्यक्रम, रामदास आठवले यांची टोलेबाजी

उद्धव ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम हा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर याआधी उद्धव ठाकरेंनी भाजपाचा करेक्ट कार्यक्रम केला होता, अशी टोलेबाजी रामदास आठवले यांनी केली आहे.

Ramdas Athwale : शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा तर त्याआधी ठाकरेंनी भाजपाचा केला होता करेक्ट कार्यक्रम, रामदास आठवले यांची टोलेबाजी
रामदास आठवले
Image Credit source: tv9
| Updated on: Sep 06, 2022 | 6:00 PM

पुणे : सध्या देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस आणि माझ्या बाजूने वारे आहे. पुढच्या निवडणुका आम्ही एकत्रित लढवू. आमच्या पक्षाला जागा मिळाल्या पाहिजेत, ही आमची मागणी आहे. मात्र भाजपाच्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढवणार नाही, ही भूमिका आम्ही घेतली आहे, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athwale) म्हणाले आहेत. ते पुण्यात बोलत होते. राज्यात आगामी निवडणुकांसंदर्भात त्यांनी आपले मत व्यक्त केले. सध्या रामदास आठवले भाजपासोबत असून केंद्रात राज्यमंत्री आहेत. मात्र भाजपाच्या चिन्हावर ते निवडणूक लढले. मात्र आता आम्हाला आमच्या चिन्हावर निवडणूक (Election) लढवायची आहे. आम्ही भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही, असे ठामपणे आठवले म्हणाले आहेत.

‘मनसेला सोबत घेण्यास आमचा विरोध’

राज्यात त्याचप्रमाणे येणाऱ्या महापालिका निवडणुका लक्षात घेता रामदास आठवले म्हणाले, की मनसेला सोबत घेण्यास आमचा विरोध आहे. मनसेच्या भूमिकेमुळे भाजपाला फटका बसू शकतो, असे ते म्हणाले. उत्तर भारतीयांची मते आहेत, गुजराती मते आहेत, दक्षिण भारतीय नागरिकांची मते आहेत. ही मते आपल्याला मिळणार नाहीत, त्यामुळे आपला तोटा होण्याची शक्यता आहे. पुण्याचा विचार केला तर पुण्यात विधानसभेची आम्हाला जागा नाही. मात्र दिली तरी आम्ही निवडून येऊ शकत नाही, हे आठवलेंनी मान्य केले.

‘शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच’

शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. सुधीर मुनगंटीवार जरी म्हणाले, की करेक्ट कार्यक्रम आम्ही केला, तरी उद्धव ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम हा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर याआधी उद्धव ठाकरेंनी भाजपाचा करेक्ट कार्यक्रम केला होता, अशी टोलेबाजी रामदास आठवले यांनी केली आहे.

‘114 जागा निवडून येण्यास अडचण नाही’

मागीलवेळी भाजपा आणि आरपीआय एकत्र असताना 82 जागी निवडून आणल्या. त्यामुळे मेजॉरिटीपैकी 114 जागा निवडून आणण्यामध्ये आपल्याला काही अडचणी येणार नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले.