AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravikant Varpe : सुप्रियाताईंच्या विकासाचा डोंगर पाहायला या; निर्मला सीतारामन, चंद्रशेखर बावनकुळेंना रवीकांत वरपेंचा टोला

निर्मला सीतारामन या 2014पासून राज्यसभेत आहेत. त्या संसदेतील महारत्न खासदार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याची भाषा करत आहेत, हे हास्यास्पद आहे, असे रवीकांत वरपे म्हणाले.

Ravikant Varpe : सुप्रियाताईंच्या विकासाचा डोंगर पाहायला या; निर्मला सीतारामन, चंद्रशेखर बावनकुळेंना रवीकांत वरपेंचा टोला
भाजपावर टीका करताना रवीकांत वरपेImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Sep 06, 2022 | 4:04 PM
Share

पुणे : जे राज्यसभा आणि विधानपरिषदेवर निवडून येतात, त्यांनी बारामतीचा गड उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नये, असा टोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रवक्ते रवीकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी बावनकुळेंना लगावला आहे. ते पुण्यात बोलत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आज बारामतीत आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचा गड उद्ध्वस्त करण्याची भाषा केली होती. त्याचप्रमाणे लोकसभेत देशभरात 400+ आणि राज्यात 45+ जागा जिंकणार असल्याचेही म्हटले आहे. यावर राष्ट्रवादीच्याही प्रतिक्रिया येत आहेत. रवीकांत वरपे यांनी बावनकुळेंवर टीका केली आहे. बावनकुळेंना साधे विधानसभेचे तिकीट मिळाले नाही. जनतेतून निवडून येता आले नाही. त्यांना विधानपरिषदेवर घ्यावे लागते. ते बारामती जिंकण्याची भाषा करतात, असा बावनकुळेंना टोला लगावला. तर निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनाही वरपेंनी लक्ष्य केले आहे.

‘सीतारामन 2014पासून राज्यसभेत’

निर्मला सीतारामन या 2014पासून राज्यसभेत आहेत. त्या संसदेतील महारत्न खासदार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याची भाषा करत आहेत, हे हास्यास्पद आहे, असे वरपे म्हणाले. सुप्रिया सुळे या तीनवेळा सलग लोकसभेला निवडून आलेल्या आहेत. निर्मला सीतारामन बारामती फिरायला येणार असतील, तर आम्ही बारामती मतदारसंघात केलेला विकास त्यांना दाखवू. तुम्ही निश्चित याठिकाणी या. तुम्हाला फार काळ राज्यसभेवर राहायचे नसेल तर याठिकाणी सुप्रिया सुळे यांनी केलेला विकासाचा डोंगर पाहा. बारामती लोकसभेचे मॉडेल उभे केले आहे, त्याचे प्रेझेंटेशन माझ्याकडे आहे. ते पाहावे. याचा उपयोग तुम्हाला लोकसभेत निवडून येण्यासाठी नक्कीच होईल, असा टोला सीतारामन यांना वरपेंनी लगावला.

‘संसदेतील कामगिरी याविषयी सविस्तर अहवाल माझ्याकडे’

सुप्रियाताईंनी केलेल्या कामाचे पुस्तक माझ्याकडे आहे. संसदेतील कामगिरी याविषयी सविस्तर अहवाल आणि माहिती माझ्याकडे आहे. विकासकामे असतील, रस्ते, जलसंधारण, रेल्वे अशा विविध कामांमध्ये सुप्रियाताई देशात आघाडीवर आहेत. त्यामुळे ज्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले नाही, त्या बावनकुळे तर ज्या राज्यसभेवर काम करत आहेत त्या निर्मला सीतारामन अशांनी बारामतीचा गड उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नये, असे वरपे म्हणाले.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.