AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडीची कारवाई बघून काही जण भाजपकडे गेलेत, शरद पवार यांचा इशारा कुणाकडे?

राजकारणात सत्याची कास सोडून जात असतील. तर अशा लोकांना सामान्य लोकं त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. असंही शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.

ईडीची कारवाई बघून काही जण भाजपकडे गेलेत, शरद पवार यांचा इशारा कुणाकडे?
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Aug 20, 2023 | 5:37 PM
Share

पुणे : देशात काही जणांविरोधात ईडीची कारवाई केली जात होती. त्यामुळे आमच्या काही सहकाऱ्यांनी रस्ता बदलला. ईडीच्या भीतीने हे सर्व केले गेले. ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याचे सांगतात. पण, आमची वैचारिक भूमिका बदलली नाही. तिकडं आत जावं लागेल, अशी भूमिका तिकडे गेलेले काही लोकं मांडतात, असंही शरद पवार म्हणाले. राजकारणात सत्याची कास सोडून जात असतील. तर अशा लोकांना सामान्य लोकं त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. असंही शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.

पुणे येथे बोलताना शरद पवार म्हणाले, वर्तमानपत्र बारकाईने वाचले पाहिजे. टेलीव्हीजन बघीतले पाहिजे आणि काय चालले याचा विचार केला पाहिजे. महागाई, गुन्हेगारी काही संपत नाही. शेतकऱ्यांना बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही. असे अनेक प्रश्न आहेत. याची सामान्यांना चिंता आहे, याची आठवण शरद पवार यांनी करून दिली.

गुजरातला किती प्रकल्प गेले?

गेल्या सहा महिन्यांत गुजरात किंवा अन्य राज्यात किती प्रकल्प गेले. जो कारखाना राज्यात येणार होता. तो कारखान येथून अन्य राज्यात हलवला गेला. यात चांगले काम करण्याची संधी राज्य सरकारने गमावली आहे. असंही शरद पवार यांनी राज्य सरकारला फटकारले.

कांदा निर्यात धोरणावर टीका

कांद्यावर शुल्कवाढ केल्याने जगातील मार्केट शेतकऱ्यांसाठी बंद झालं. अशी टीका शरद पवार यांनी केंद्राच्या कांदा निर्यात धोरणावर केली. काहीही निर्णय घेतले जातात. वाराणसी जिथून पंतप्रधान निवडून येतात. तिथं गांधीवादी संस्था आहे. १९६० साली जमीन रेल्वे खात्याकडून घेतली होती. विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, लालबहाद्दूर शास्त्री यांच्या सह्या होत्या.

गांधीवादी विचाराचा प्रचार प्रसार केला जात होता. हे सारं थांबवायला सांगण्यात आलं. तिथली गांधी विचारांची पुस्तकं फेकून देण्यात आली. अशी भूमिका वाराणसीमध्ये घेतली जाते. ज्या ठिकाणाहून पंतप्रधान निवडून येतात. याचा अर्थ सत्तेचा गैरवापर करण्यासाठी कोणत्या पातळीवर सरकार जात आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....