AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन शाळांना कुलूप ठोकले, मग मुलांची शाळा भरली कुलूप ठोकणाऱ्या अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर

सोलापुरात अक्कलकोट तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी मैंदर्गी नगरपरिषदेच्या सीईओ कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकल्यामुळे विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरु केला आहे. कर थकल्यामुळे शाळेला कुलूप ठोकले गेले.

तीन शाळांना कुलूप ठोकले, मग मुलांची शाळा भरली कुलूप ठोकणाऱ्या अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर
| Updated on: Mar 31, 2023 | 2:21 PM
Share

सागर सुरवसे, सोलापूर : अधिकारी काय करतील, याचा काही नेम नाही. आपण किती कर्तव्य तत्पर आहोत, हे दाखवण्यासाठी काही करु शकतात. सोलापूर जिल्ह्यातील नगर परिषदेमधील अधिकाऱ्याने चक्क तीन शाळांना कुलूप ठोकले. मग काय शिक्षकांनी आपला फंडा वापरला अन् या मुलांची शाळा अधिकाऱ्याच्या कार्यालयात भरवली. शिक्षणाच्या आईचा घो करणाऱ्या या अधिकाऱ्याचे काय करावे, असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे. दरम्यान शाळेला कुलूप ठोकणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणीही केली जात आहे.

काय आहे विषय

सोलापुरात अक्कलकोट तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी मैंदर्गी नगरपरिषदेच्या सीईओ कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. मैंदर्गी नगर परिषदेने कर भरला नसल्याच्या कारणावरुन जिल्हा परिषदेच्या तीन शाळांना कुलूप ठोकले आहे. ऐन परीक्षेच्या काळात शाळेला कुलूप ठोकल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक संतप्त झालेत. संतप्त झालेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेतून घेऊन नगरपरिषदेपर्यंत मोर्चा काढत सीईओच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरु केले आहे. जिल्हा परिषदेच्या तीन शाळांनी कर थकवल्याने नगर परिषदेच्या सीईओंच्या या कर्तव्य तत्परतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण? असा सवाल केला जात आहे.

ही कोणती पद्धत

शाळा सरकारी अन् नगरपरिषद सरकारी. दोन विभागाच्या या भांडणाचा भुर्दंड विद्यार्थ्यांना का बसतो? असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे या प्रकरणी शाळेला कुलूप ठोकण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

परीक्षाचा काळ आला असताना कारवाई

मार्च महिन्यात परीक्षांना सुरुवात होत असते. परीक्षांचा कालावधी जवळ आला असताना शाळेला कुलूप ठोकून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले गेले आहे. अनेक शासकीय कार्यालयांची थकबाकी असते, श्रीमंत व बडे प्रस्थ असलेले लोकही आपली थकबाकी भरत नाही, परंतु त्यांच्यांवर कारवाई करण्याची हिंमत अधिकारी दाखवत नाही. अधिकाऱ्यांच्या या वागणुकीबद्दल पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश कधी मिळणार? असा प्रश्न पालक आणि शिक्षकांच्या मनात आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.