AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री काम आटोपून जेवायला गेले होते तिघे मजूर, पण वाटेतच काळाचा घाला

तिघेही परप्रातातून कामानिमित्त पुण्यात आले. रात्री काम झाल्यावर जेवायला गेले. जेवून घरी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

रात्री काम आटोपून जेवायला गेले होते तिघे मजूर, पण वाटेतच काळाचा घाला
जुन्नरमध्ये ट्रॅव्हल्सच्या धडकेत बाईकवरील तिघे ठारImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 08, 2023 | 1:09 PM
Share

जुन्नर : नगर-कल्याण महामार्गावर वडगाव आनंद गावच्या शिवारात मोटारसायकलला टेम्पो ट्रॅव्हल्स बसने दिलेल्या धडकेत तिघे जण जागीच ठार झाले. रात्री अकरा वाजण्याच्या ही घटना सुमारास घडली असून, तिघेही मयत हे परप्रांतीय आहेत. तिघेही आळेफाटा येथे एका खाजगी बेकरीत काम करत होते. मयतांमध्ये एका अल्पवयीन मजुराचा समावेश आहे. योगेश रामकुमार, चाहात बाबुराव आणि संजीव कुमार अशी तिघा मयतांची नावे असून, सर्व मूळचे उत्तरप्रदेशातील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुरुवारी सकाळी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

जेवण करुन परतत असताना अपघात

आळेफाटा येथे असलेल्या एका खाजगी बेकरीत काम करणारे मजूर बुधवारी रात्री कल्याण रोडवर एकाच दुचाकीने जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण करुन रात्री सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घरी परतत होते. यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या टेम्पो ट्रॅव्हल्स बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघांच्याही डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. तिघेही मूळचे उत्तर प्रदेशाती रहिवासी असून, कामानिमित्त महाराष्ट्रात राहत होते.

इगतपुरीजवळ अपघातात दोन साध्वींचा मृत्यू

मुंबई नाशिक महामार्गावर हॉटेल ऑरेंज समोर कंटेनरच्या धडकेत दोन जैन महिला साध्वी यांचा मृत्यू झाला आहे. कंटेनरने पिकअप आणि ओमनी कारला धडक दिल्यानंतर पायी चालणाऱ्या महिला साध्वींना धडक दिली. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नाशिकला चातुर्मास करण्यासाठी पायी जात असताना अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.