AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट, बैठकीत किती जण राहिले अनुपस्थित

Ajit Pawar and Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी रविवारी बंड पुकारले. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी दोन गट निर्माण झाले. पुणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट निर्माण झाले आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर हे स्पष्ट झाले.

पुणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट, बैठकीत किती जण राहिले अनुपस्थित
| Updated on: Jul 05, 2023 | 10:48 AM
Share

योगेश बोरसे, पुणे : राज्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी दोन गट तयार झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना-भाजप युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यांसोबत अनेक किती जण आले आहेत? याचा खुलासा अद्याप झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याचे उत्तर मिळवण्यासाठी दोन्ही गटाकडून बुधवारी बोलवण्यात आलेली बैठक महत्वाची आहे. या बैठकीनंतर कोण-कोणासोबत हे स्पष्ट होणार आहे. परंतु मंगळवारी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्या निर्णयास अनेकांचे समर्थन नसल्याची माहिती समोर येत आहे.

किती जण आहेत शरद पवार यांच्यासोबत

पुणे शहर राष्ट्रवादीमधील एक मोठा गट अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी शहर कार्यकारीणीच्या बैठकीला ४४ पैकी फक्त २३ माजी नगरसेवक उपस्थित असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे उर्वरित जण अजित पवार यांच्या गटात जाऊ शकतात. तसेच पुणे शहरातील दोन्ही आमदारांची बैठकीला दांडी मारली होती. यामुळे ते सुद्धा अजित पवार यांच्यासोबत असतील, असे म्हटले जात आहे. यामुळे शरद पवार यांच्यासोबत पुणे शहरातील २३ माजी नगरसेवक असतील, असे म्हटले जात आहे.

त्या लोकांची नावे पाठवणार

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारीणीला उपस्थित नसणाऱ्यांची नावे पक्ष नेतृत्वाकडे पाठवली जाणार आहे, अशी माहिती पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. तसेच बुधवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी पुणे शहरातून अनेक जण जाणार आहेत. शरद पवार यांना समर्थन देण्यासाठी पुण्यातून पदाधिकारी जाणार असल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.