AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Updates : अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट, पुणे, मुंबईत काय असणार परिस्थिती

Pune and Mumbai Rain : राज्यात मान्सूनचे आगमन होऊन दोन आठवडे झाले आहेत. पाऊस आता अनेक ठिकाणी जोर धरत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना वेग दिला आहे. देशात जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे.

IMD Weather Updates : अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट, पुणे, मुंबईत काय असणार परिस्थिती
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 07, 2023 | 11:01 AM
Share

पुणे : देशभरात मान्सून दाखल झाला आहे. हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईला यलो अलर्ट दिले तर पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. त्याचवेळी केरळमध्ये १ ते ६ जून दरम्यान १०६ टक्के पाऊस झाल्याचे म्हटले आहे. केरळमध्ये 129 मिमी पावसाऐवजी 266 मिमी पाऊस या आठवड्यात झाला आहे. देशातील अनेक राज्यात मुसळधार जलधारा कोसळत आहेत. गुजरातमध्ये अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे.

राज्यात कोणत्या जिल्ह्यास अलर्ट

आयएमडीने मुंबई, ठाणे, सिंधूदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वासिम आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. त्याचवेळी सातारा, पुणे, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्यामध्ये ऑरेंज् अलर्ट दिला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाट मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

नाशिकमध्ये जोरदार पाऊस

नाशिकमध्ये पुढचे 2 दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यातील 24 प्रकल्पात 26 टक्के पाणीसाठा आहे. गंगापूर धरणात गतवर्षीच्या तुलनेत 5 टक्के अधिक साठा आहे. जुलै महिन्यामध्ये सरासरी इतका पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पाणी कपातीचा निर्णय तूर्त घेण्यात आलेला नाही. गंगापूर धरणातही ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. आता पावसाने चांगला जोर धरल्यास पिण्याच्या पाण्याचा वर्षभराचा प्रश्न मिटणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात शेती कामांना वेग आला आहेत. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी समाधानी झाला आहे. सध्या होत असलेला पाऊस शेतीसाठी पूरक आहे.

बुलढाण्यात जोरदार पाऊस

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात मागील दोन दिवसांपासून धो धो पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. शेतांना सध्या तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. वाशिम जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या दमदार पावसानंतर आता पेरण्यांना वेग आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील १९ प्रकल्पांमध्ये २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे. या पावसामुळे पेरण्यांना वेग मिळणार आहे. कल्याण डोंबिवलीत परिसरात गुरुवारीरात्रीपासून पावसाची संततधार सुरू झाली आहे. या पाऊसामुळे कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे.

Follow Us
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या दिवंगत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख...
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख... 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...