AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जागतिक जलदिनादिवशीच पाण्यासाठी भटंकती; दौंडमधील जिरेगावकर पाण्यासाठी फोडताहेत टाहो…

पिण्याचा पाण्याचा प्रश्न या परिसरात गंभीर आहे, त्यातच मार्च महिना सुरु झाला असून अजून मे महिन्यातील कडक उन्हाळा सुरु होण्याआधीच येथील लोकांची पाण्यासाठी पायपीठ सुरु झाली आहे. ज्या प्रमाणे माणसांची पाण्यासाठी पायपीठ सुरु आहे त्याच प्रकारे शेती करणाऱ्या माणसांच्या जनावरांचीही पाण्यासाठी हाल सुरु आहेत.

जागतिक जलदिनादिवशीच पाण्यासाठी भटंकती; दौंडमधील जिरेगावकर पाण्यासाठी फोडताहेत टाहो...
Pune Daund Water
| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 7:08 PM
Share

पुणेः आज जागतिक जलदिन (World Water Day) आहे, सर्वत्र जागतिक जलदिन वेगवेगळ्या कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. मात्र याउलट परिस्थिती पुणे जिल्ह्याच्या दौंड (Daund) तालुक्यातील जिरेगावकरांची (Jiregaon) आहे. मात्र पाण्यासाठी तारांबळ सुरू आहे. विशेषतः जनाई शिरसाई उपसा सिंचन विभागाकडे पाण्याची मागणी करूनही अद्याप पाणी मिळाले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करत कोणी पाणी देता का पाणी अशी विचारायची वेळ आली आहे.

पिण्याचा पाण्याचा प्रश्न या परिसरात गंभीर आहे, त्यातच मार्च महिना सुरु झाला असून अजून मे महिन्यातील कडक उन्हाळा सुरु होण्याआधीच येथील लोकांची पाण्यासाठी पायपीठ सुरु झाली आहे. ज्या प्रमाणे माणसांची पाण्यासाठी पायपीठ सुरु आहे त्याच प्रकारे शेती करणाऱ्या माणसांच्या जनावरांचीही पाण्यासाठी हाल सुरु आहेत. त्यामुळे जिरेगाव येथील पाणी समस्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीच सोडवावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ज्या प्रकारे गंभीर होत चालला आहे, त्याच प्रकारे शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. परिसरात पाणी नसल्याने शेतातील पिके वाळू जाण्याच्या मार्गावर आहेत. आजही अनेक पिके शेतात असून पिकांना पाणी नसल्याने हातात आलेली पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतीचेही प्रचंड नुकसान होणार असल्याचे दिसत आहे.

पाण्यासाठ्यांनी तळ गाठला

पाण्याअबभावी शेतातील ऊस जळून गेला आहे. ज्या तलावाचा शेतकऱ्यांना आधार होता त्या तलावातील पाणीही आठत गेले आहे. त्यामुळे आता पाणी प्यायचे कोणते आणि कसे असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तलावर, विहिरी आणि कुपनलिकेतील पाण्यासाठ्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. घागर पाण्यासाठी कोसो मैल दूर जावे लागत आहे.

पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे

मार्च महिना चालू झाल्यापासून जिरेगावातील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. कडक उन्हाळ्यातही पाण्यासाठी येथील महिलांची वणवण थांबली नाही. त्यामुळे दौंड तालुक्यातील या ग्रामस्थांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून जिरेगावातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवावा अशा मागणीही त्यांनीही केली आहे. त्यामुळे जिरेगावातील पाण्याचा प्रश्न मिठवण्यात आला तर येथील महिलांची पाण्यासाठीची होणारी वणवण थांबणार आहे. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांनी जिरेगावातील पाणी प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी होत आहे.

संबंधित बातम्या

ED Raid : ‘उद्धव ठाकरेंना रात्री झोप येणार नाही’, मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरील ईडी कारवाईनंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

Rashmi Thackeray Brother : रश्मी ठाकरेंचे भाऊ असलेले श्रीधर पाटणकर नेमके आहेत कोण? जाणून घ्या!

ED Raids Sridhar Patankar LIVE Updates : ईडीची स्वारी मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याच्या दारी, पुन्ह रान पेटलं

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....