ठाण्यानंतर आता रायगडची जागाही बिनविरोध, तटकरेंचा मोठा डाव, पुत्र होणार आमदार!
ठाण्यापाठोपाठ आता कोकणातील रायगड आणि यवतमाळ विधान परिषदेची निवडणुक बिनविरोध होणार आहे. महायुतीला या जागा बिनविरोध करण्यात यश आले आहे.

Raigad Vidhan Parishad Election : राज्याज्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला आहे. एकूण 17 जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. दरम्यान, आता या निवडणुकीतील अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत संपत आलेली आहे. त्यामुळे बंडखोर नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नाशिक विधानपरिषदेची निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आलेली आहे. या जागेवरून गोकुळ गीते आणि गणेश गीते यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, एकीकडे महायुतीत काही जागांवर बंडखोर निवडणूक लढवण्यावर ठाम असताना दुसरीकडे ठाण्यापाठोपाठ रायगड या जागेसाठी महायुतीला मोठे यस आलेले आहे. येथे रायगडची जागा बिनविरोध होणार असून त्या जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार अनकेत तटकरे हे आता आमदार होणार आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यापाठोपाठ आता कोकणातील रायगड ही जागा आता बिनविरोध होणार आहे. ही जागा बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केला जात होते. ही जागा राष्ट्रवादीला सुटली होती. राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आता त्यांच्याविरोधात कोणताही उमेदवारी निवडणुकीसाठी उभा नाही. त्यामुळे आता ही जागा बिनविरोध होणार आहे.
रायगडच्या जागेवरून झाला होता वाद
दरम्यान ही जागा मिळवण्यासाठी महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच झाल्याचे पाहायला मिळाले. ही जागा आम्हालाच मिळावी यासाठी शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार सुनील तटकरे या दोन्ही नेत्यांनी पूर्ण ताकद लावली होती. काहीही झालं तरी ही जागा आम्हालाच मिळाली पाहिजे, असे या नेत्यांचे मत होते. परंतु शेवटी ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली. त्यानंतरही शिवसेनेचे नेते आक्रमक झाले होते. राष्ट्रवादीला जर ही जागा जात असेल तर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आम्हाला म्हणजेच शिवसेनेला मिळायला हवे, असे मत मत गोगावले तसेच शिवसेनेच्या इतर नेत्यांनी व्यक्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना आमदारकी देण्याच्या बदल्यात गोगावले यांना पालकमंत्रिपद दिले जाईल, असे ठरल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यात कुठे कुठे निवडणूक बिनविरोध
राज्यात रायगड जागेसह पुणे, यवतमाल, ठाणे, चंद्रपूर, अहिल्यानगर या जागाही बिनवविरोध झाल्या आहेत. म्हणजेच एकूण सतरा जांगपैकी 6 जागांवर काही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत6