AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या भेटीनंतर साकारली गेली महायुती… रामदास आठवले यांनी उलगडले ते ‘राज’

लोकसभा निवडणुकीत एनडीएसोबत असणाऱ्या इतर राज्यातील सर्व पक्षांना जागा दिल्या. परंतु महाराष्ट्रात आमच्या पक्षाचा विचार झाला नाही. खरंतर मी साधा, भोळा व्यक्ती राजकारणात आहे. मला प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे डावपेच येत नाही.

बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या भेटीनंतर साकारली गेली महायुती... रामदास आठवले यांनी उलगडले ते 'राज'
ramdas athawale
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 05, 2024 | 2:53 PM
Share

हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असताना शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली होती. राज्यातील राजकारणात एक अनोखा प्रयोग होता. त्यानंतर राज्यातील राजकारणास वेगळीच दिशा मिळाली. दोन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले. नेमकी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र कशी आली? यासंदर्भात आजही अनेकांच्या मनात उत्सुक्ता आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यासंदर्भातील रहस्य उघड केले. ‘टीव्ही ९ मराठी डिजिटल’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत महायुती कशी साकारली गेली, ते त्यांनी सांगितले.

बाळासाहेबांची भेट घेतली अन्…

बाळासाहेब ठाकरे वांद्रे येथे राहतात. मी त्याच परिसरात राहत होतो. त्यामुळे बाळासाहेबांची भेट घ्यावी, असे मला वाटत होते. एकेदिवशी मी सरळ बाळासाहेबांना भेटण्यासाठी गेलो. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले, “बाबासाहेब आंबडेकर आणि माझे वडील प्रबोधनकार ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मग आपण का वेगळे का असावे. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आली पाहिजे.” मी बाळासाहेबांना म्हणालो, “तुम्ही मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरास विरोध केला होता. यामुळे आपल्याबद्दल आमच्या समाजात गैरसमज आहेत.” परंतु त्या भेटीनंतर मी रिपाईचे कार्यकर्ते, विचारवंत, साहित्यिक, अधिकाऱ्यांची बैठक घेतल्या. त्यांच्यासमोर हा विषय मांडला. त्यानंतर राजकारणात असे धाडशी निर्णय घ्यावे लागतात, असे सर्वच जणांचे मत पडले. सर्वांनी आपण शिवसेना भाजपसोबत जाण्यास हरकत नाही, असे सांगितले. त्यावेळी शिवसेना-भाजपची दोन्ही पक्षांची युती होती. आम्ही त्यांच्यासोबत गेलो. त्यानंतर महायुती हे नाव मिळाले.

जुन्या मित्राकडे लक्ष दिले नाही

लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना रिपाईचा विचार झाली नाही. त्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, २०१९ मध्ये विधासभेसाठी पाच आमदार दिले होते. आता २०२४ मध्ये ८ ते १० जागा आम्हाला देतील अशी अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएसोबत असणाऱ्या इतर राज्यातील सर्व पक्षांना जागा दिल्या. परंतु महाराष्ट्रात आमच्या पक्षाचा विचार झाला नाही. खरंतर मी साधा, भोळा व्यक्ती राजकारणात आहे. मला प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे डावपेच येत नाही. परंतु लोकसभेच्या जागावाटप चर्चेच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर लोकसभेला जागा मिळत नसल्यामुळे कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यावेळी सर्वांनी सांगितले, आपणास कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे सोबतच राहू या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एक मंत्रीपद, दोन महामंडळाचा चेअरमन तसेच जिल्ह्यातील कमिट्यांवर वाटा दिला जाणार असल्याचे आश्वसन दिले आहे.

मी दोन पावले मागे आलो…

सत्तेत भागीदार मला मिळाली. परंतु लोकसभेत जागा मिळाल्या नाही. त्यानंतरही मी दोन पावले मागे आलो. परंतु हे लोक मागे येण्यास तयार नव्हते. तिन्ही पक्ष भांडत राहिले. मी माझा विषय दोन दिवसांत संपवला होता. काँग्रेसच्या काळात सहा एमएलसी आम्हाला मिळाल्या होत्या. पुण्यात उपमहापौर झाले होते. अनेक ठिकाणी नगराध्यक्ष आमचे होते. अजून आम्हाला संधी मिळावी. सन्मानाची वागणूक मिळावी, अशी अपेक्षा आहे. दोन मित्र मिळाल्यानंतर आयपीआयचे नाव घेतले जात नव्हते. परंतु आता निवडणुकीत आरपीआयचे नाव घेतले जात आहेत.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना