AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गुहागरची जनता आता भास्कर जाधव यांना सन्यास देणार’, त्या आरोपांचा कदमांकडून जोरदार समाचार

रामदास कदम यांनी विजयासाठी 2009 ला अघोरी पूजा केली होती, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला होता, त्यानंतर आता कदम यांनी भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर देताना जोरदार हल्लाबोल केला आहे.

'गुहागरची जनता आता भास्कर जाधव यांना सन्यास देणार', त्या आरोपांचा कदमांकडून जोरदार समाचार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 23, 2025 | 5:17 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. 2009 साली कदम यांनी निवडणुकीत विजयासाठी अघोरी पूजा केल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला, भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यानंतर आता कदम चांगलेच आक्रमक झाले आहेत, त्यांनी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भास्कर जाधव जे बोलले तेवढी त्यांची औकात नाही, एवढा मोठा माणूस तो नाही. 1995 आणि 2000 मध्ये मीच बाळासाहेबांना सांगून त्यांना तिकीट द्यायला सांगितलं, असं कदम यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले कदम? 

भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपांनंतर कदम चांगेलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.  भास्कर जाधव जे बोलले तेवढी त्यांची औकात नाही, एवढा मोठा माणूस तो नाही. 1995 आणि 2000 मध्ये मीच बाळासाहेबांना सांगून त्यांना तिकीट द्यायला सांगितलं होतं.  नौटंकी करण्यात भास्कर जाधव यांचा हात कोणी पकडू शकणार नाही, काळी विद्या करून तुम्ही आणि तुमचं कुटुंब दमलं, भास्कर जाधव हे खोटारडे आहेत.  एखाद्या व्यक्तीला बदनाम कसं करायचं हे भास्कर जाधव यांच्याकडू शिकावं असं कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना कदम यांनी म्हटलं की, शिंदे सुरतला गेले, होते तेव्हा भास्कर जाधव हे पण सुरतपर्यंत आले होते, ते सुरतच्या बॉर्डरपर्यंत जावून आले. पण एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तुम्ही येवू नका. भास्कर जाधव नौटंकी करत आहेत. उद्धव ठाकरेंकडे येऊन चूक केली असं ते म्हणतात. गुहागरची जनता आता भास्कर जाधव यांना संन्यास देणार आहे, ते फक्त  1200 मतांनी निवडून आलेले आहेत, असा घणाघात कदम यांनी जाधव यांच्यावर केला आहे. दरम्यान कदम यांच्या या आरोपांनंतर आता आरोप- प्रत्यारोपाचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे. कदम यांना आता भास्कर जाधव हे काय उत्तर देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत