AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट, का वाढलाय पावसाचा जोर?

Weather update and Rain : राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस सुरु आहे. मुंबईत बुधवारपासून जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना गुरुवारी रेड अलर्ट दिलाय.

राज्यातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट, का वाढलाय पावसाचा जोर?
| Updated on: Jul 27, 2023 | 8:42 AM
Share

पुणे | 27 जुलै 2023 : राज्यभरात सुरु असलेला मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. मुंबई, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पाऊस होत आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यास गुरुवारी रेड अलर्ट दिला आहे. तसेच काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. विदर्भात काही ठिकाणी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे या भागांतील नद्या भरभरून वाहू लागल्या आहेत. गोदावरी नदीची पातळी वाढत असल्यामुळे नदीच्या काठावर असलेले मेडिगट्टा धरणाचे दरवाजे चार फुटांनी उघडण्यात आले आहे.

मुंबईत काय आहे परिस्थिती

मुंबईत गुरुवारी दुपारपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर गुरुवारी पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईला रेड अलर्ट दिल्यामुळे कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन मुंबई आयुक्त इकबालसिंग चहल यांनी केले आहे. ठाणे जिल्हा परिषदेने पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

का सुरु आहे पावसाचा जोर

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याची वाटचाल वायव्य दिशेकडे होत आहे. त्यामुळे अजून पुढील तीन, चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी वर्तवली आहे.

पुणे जिल्ह्यास पुन्हा रेड अलर्ट

पुणे जिल्ह्यास गुरुवारी रेड अलर्ट दिला आहे. पुण्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. गडचिरोली, रायगड, रत्नागिरी, सातार जिल्ह्यास रेड अलर्ट दिला आहे. ठाणे, पालघर, अमरावती जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोल्हापुरात पावसाने विश्रांती घेतली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या दहा तासांपासून स्थिर आहे. यामुळे राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा बंद करण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील धरणांत असणारा पाणीसाठा

  • खडकवासला: ९६ टक्के
  • पानशेत: ७३ टक्के
  • वरसगाव: ६५ टक्के
  • टेमघर: ४९ टक्के

विदर्भात पाऊस

विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर, सोलापूर, सांगलीमध्ये पावसाची शक्यता आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.