
अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही महाराष्ट्र सावरलेला नाही. 28 जानेवारीला बारातमीजवळ विमान अपघातात अजित पवारांचे निधन झाले. अजित दादांच्या विमान अपघातावर अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. आज अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी या विमान अपघातावर पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विमान कंपनीवर गंभीर आरोप केले होते. अजित पवार यांना सोडून हे विमान कुठे जाणार होते याबाबतही रोहित पवार यांनी सांगितले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रोहित पवार यांनी म्हटले की, आपले दादा गेले. आज व्हिएसआर कंपनी सीएम, इतर मंत्र्यांना विमानसेवा पुरवते. त्यांच्या संरक्षणाची काळजी घेतली पाहिजे. व्हिएसआरला फेव्हर का केलं जातं? व्हिएसआरचा एवढा होल्ड का आहे? आम्ही डीजीसीआरच्या काही लोकांशी बोललो. पायलटने एकदा विमान उडवल्यानंतर पुन्हा तो 12 तासानंतरच फ्लाईट उडवू शकतो. पण कंपनी सात तासापूर्वीच पायलटला विमान उडवायला सांगतात. नोकरीवरून काढण्याची धमकी दिली जाते. कॉस्ट कटिंगमध्ये ही कंपनी माहीर आहे असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
पुढे बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की, एखाद्या विमानतळावर व्हिजिबिलिटीचा इश्यू असेल तर पायलटला दोन स्टेशन सांगावं लागतं. मुंबई किंवा हैद्राबाद हे स्टेशन असू शकतात. विमान अजितदादांना घेऊन बारामतीला जाणार होते. त्यानंतर ते शमशाबाद ते पटनाला जायचे होते. विमान कंपनीला घाई होती. त्यामुळे पायलटने व्हिजिबिलिटी कमी असताना विमान उतरवलं अशी आम्हाला शंका आहे. कारण जर हे विमान पुणे किंवा इतर ठिकाणी गेले असते तर कंपनीचं 10 लाखाचं नुकसान झालं असतं. त्यामुळे कंपनीकडून पायलटवर प्रेशर होतं असा आमचा दावा आहे.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, विमानात स्टॉल वॉर्निंग सिस्टिम बंद होती. त्यामुळे ही घटना घडली असावी. याचं बेस मेंटेनन्स केलं कोणी? पीपीटी चालू होतं, यातून कॉकपीटमध्ये चालू असतं ते कळतं. मेन पायलट कपूर असेल तर पाठक को पायलट असतात. को पायलट इंटरॅक्शन करतात. पीटीटी दाबूनही त्यात काही आवाज येत नव्हता. म्हणजे ती सिस्टिम बंद होती. ब्लॅक बॉक्स रिकव्हर केल्यावर अनेक गोष्टी कळतील असंही रोहित पवार म्हणाले.