AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूरग्रस्त भागात खांद्याला खांदा लावून काम, आर्मीच्या जवानांचा संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यांना सॅल्युट

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनीही पूरग्रस्त भागात मोठं काम केलं आहे. खुद्द आर्मीच्या जवानांनीच त्यांचं कौतुक केलं आहे.

पूरग्रस्त भागात खांद्याला खांदा लावून काम, आर्मीच्या जवानांचा संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यांना सॅल्युट
| Updated on: Aug 13, 2019 | 12:01 PM
Share

Sambhaji Bhide सांगली :  पूरग्रस्त सांगली जिल्ह्यात सरकारी पातळीवर मदतकार्य सुरु आहे. आर्मी, नेव्ही, एनडीआरएफ, एसडीआरआफसह स्थानिक संघटना, विविध संस्था स्वत:हून मदत करत आहेत. आर्मीच्या जवानांना मदतकार्यात स्थानिकांची मोठी साथ लाभत आहे. संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या (Shiv Pratishthan Hindustan) धारकऱ्यांनीही पूरग्रस्त भागात मोठं काम केलं आहे. खुद्द आर्मीच्या जवानांनीच त्यांचं कौतुक केलं आहे.

शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आर्मीच्या जवानांना प्रचंड मदत केल्याची भावना जवानांनी व्यक्त केली. जवानांच्या जेवणा-खाण्याची सोय असो, त्यांच्या बचावकार्यात मदत असो या धारकऱ्यांनी जवानांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. महत्त्वाचं म्हणजे पुरामुळे सर्व वाटा नष्ट झाल्यामुळे जवानांना मदत पोहोचवणं अवघड झालं होतं. अशा परिस्थितीत जवानांना मार्ग दाखवणे, त्यांना घटनास्थळापर्यंत पोहोचवण्याचं काम शिवप्रतिष्ठानने केल्याचं जवानांनी सांगितलं.

धारकऱ्यांनी केलेल्या सहकार्याचं कौतुक करताना एका जवानाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

“नेमकी परिस्थिती काय आहे याबाबतचा अंदाज नव्हता. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना सलाम आहे. त्यांनी आम्हाला खूप म्हणजे खूप साथ दिली. सचिन मोहित या कार्यकर्त्याने तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमची साथ सोडली नाही. खाण्यापासून, नाश्त्यापासून जेवणापर्यंत सर्व सोय केली. आमच्यासोबत बरेच कार्यकर्ते होते, सर्वांची नावं माहित नाही. त्यांनी मदत केली. आमच्या इतकंच त्यांनीही काम केलं. अशीच जर एकता राहिली तर आपण कुठेही फतेह करु शकतो, कुठेही विजय मिळवू शकतो” अशी प्रतिक्रिया जवानाने दिली.

जितेंद्र आव्हाड यांचं टीकास्त्र

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडे यांच्यावर टीका केली होती.

कोण आहेत संभाजी भिडे?

भिडे गुरुजी किंवा संभाजी भिडे या नावाने प्रसिद्ध असले तरी त्यांचं मूळ नाव मनोहर भिडे असल्याची माहिती आहे. संभाजी भिडे 85 वर्षांचे असून ते सांगलीत राहतात. त्यांचं मूळ गाव साताऱ्यातील सबनीसवाडी आहे.

महाराष्ट्रात 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या कोरेगाव भीमा दंगलीत संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप होता.

न्यूक्लिअर फिजिक्समध्ये एमए केल्यानंतर ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते, असं त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येतं. संभाजी भिडे पायात चप्पल घालत नाहीत. ते अनवाणी चालतात. प्रवास करताना सायकल किंवा एसटीने प्रवास करतात, असं म्हटलं जातं.

संभाजी भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते, मात्र त्यांचे मतभेद झाल्याने त्यांनी श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान नावाची संघटना उभी केली. 1984 साली ही संघटना स्थापन झाल्याचं श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानच्या वेबसाईटवर म्हटलंय.

श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान म्हणजे प्रतिसंघ होता, संघाच्या उपक्रमांना पर्यायी उपक्रम त्यांनी सुरु केले, असं सांगितलं जातं. श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान संघटनेतील प्रत्येकाला धारकरी असं म्हणतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः “भिडे गुरुजी मला आदेश सोडतात.” असं सांगितलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संभाजी भिडे यांची चांगलीच जवळीक आहे.

Follow Us
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....