AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

70 हजारांचा बैल गावात आणला अन् थरार घडला, एक बैल,4 मगरी, किस्सा चर्चेत

गावातल्या पोरांनी पकडायचा प्रयत्न केला तर हे बैलोबा थेट नदीपात्रातच पडले. किस्सा इथेच संपत नाही, इथून पुढेच थरार सुरु झाला.

70 हजारांचा बैल गावात आणला अन् थरार घडला, एक बैल,4 मगरी, किस्सा चर्चेत
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 14, 2023 | 12:31 PM
Share

शंकर देवकुळे,सांगली : सांगलीतल्या (Sangli) भिलवडी गावात एका बैलानं नुकतीच एंट्री मारली अन् मोठा विचित्र किस्सा घडला. चांगला देशी वाणाचा बैल तब्बल ७० हजारात खरेदी केला म्हणून शेतकरी कुटुंब खुशीत होतं. मोठ्या उत्साहानं गावात आणलं. गाडीतून उतरत असताना हे जनावर थोडं सैरभैर झालं. नवं गाव पाहून गोंधळलेलं होतं. त्यातच एका ट्रॅक्टरचा हॉर्न ऐकून पार घाबरलं अन् सैरावैरा पळायला लागलं. थेट नदीकाठ गाठला. गावातल्या पोरांनी पकडायचा प्रयत्न केला तर हे बैलोबा थेट नदीपात्रातच पडले. किस्सा इथेच संपत नाही, इथून पुढेच थरार सुरु झाला. नदीतल्या 4 मगरींच्या जाळ्यात बैल सापडला..

काय घडलं नेमकं?

भिलवडीतील साठेनगरमधील अक्षय मोरे यांचा हा बैल. आटपाडी येथील बाजारातून तब्बल 70 हजार रुपयांत त्यांनी हा देशी बैल खरेदी केला. गावात मोठ्या उत्साहानं बैलाला आणलं गेलं. टेम्पोतून त्याला गावात आणलं. मात्र गाडीतून खाली उतरत असताना ट्रॅक्टरचा हॉर्न ऐकून तो गोंधळला. अन् थेट पळत सुटला. तो नदी काठाला पळाला. यावेळी युवकांनी त्याला पकडण्यासाठी दोरीचा फास केला. मात्र तो फास चुकवून बैल हा नदीपात्रात पडला. बैल हा दुष्काळी भागातील असल्याने नदीचे पाणी पाहून तो सैरभैर झाला. नवीन नदीत गोंधळून गेला. अखेर पोहत पोहत तो पैलतीरावर अंकलखोपच्या दिशेने चालला. याच दरम्यान नदीपात्रात तीन-चार मगरींनी त्याचा पाठलाग सुरू केला. बैल मगरींना चकवा देत होता अन् काठाच्या दिशेने पोहत निघाला. अखेर एक पैलतीर गाठलं, पण त्याच्या भोवती मगरी फिरतच होत्या. नव्या बैलाला असं मगरींनी घेरलेलं पाहून गावकरी प्रचंड घाबरले. अखेर इथल्या युवकांनी मदतीसाठी स्थानिक नावाडी नितीन गुरव यांना बोलावलं. नितीन गुरव तात्काळ घटनास्थळी आले. काही तरुणांना त्यांनी सोबत घेतलं. एक तराफा घेतला आणि मगरींच्या जाळ्यातून बैलाची सुखरुप सुटका केली. तब्बल चार तास चाललेला हा थरार कृष्णा काठच्या गावकऱ्यांनी डोळ्यात प्राण आणून अनुभवला.

भिलवडीत घडलेला हा थरारक किस्सा सध्या सांगलीत तुफान चर्चेत आहे. स्थानिक नावाडी नितीन गुरव यांनी तत्काळ मदत केली, त्यामुळे बैलाचा जीव वाचला. शेतकरी अक्षय मोरे यांनी गुरव यांचे आभार मानले.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.