AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वहिनीचं वैधव्य दूर केलं, भावाच्या मृत्यूनंतर पुतणीसाठी वहिनीशी लग्न

सांगली : जुन्या रुढीपरंपरांना फाटा देत सांगलीत आदर्श उदाहरण निर्माण झालंय. सांगलीतील विधवा वहिनीशी दिराने लग्न केलं आहे. सोनाली पाटील असं या नवरी मुलीचं नाव असून उमेश पाटील असं नवरदेवाचं नाव आहे. मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर पोरकी झालेल्या वहिनी सोनाली आणि लहान पुतणी रियाच्या भविष्याचा विचार करुन उमेश पाटील आणि पाटील कटुंबीयानी लग्न करण्याचा निर्णय घेतला. […]

वहिनीचं वैधव्य दूर केलं, भावाच्या मृत्यूनंतर पुतणीसाठी वहिनीशी लग्न
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

सांगली : जुन्या रुढीपरंपरांना फाटा देत सांगलीत आदर्श उदाहरण निर्माण झालंय. सांगलीतील विधवा वहिनीशी दिराने लग्न केलं आहे. सोनाली पाटील असं या नवरी मुलीचं नाव असून उमेश पाटील असं नवरदेवाचं नाव आहे. मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर पोरकी झालेल्या वहिनी सोनाली आणि लहान पुतणी रियाच्या भविष्याचा विचार करुन उमेश पाटील आणि पाटील कटुंबीयानी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्नगाठी या नशिबाने बांधल्या जातात, असे म्हटले जाते. मात्र ही नाती अपघातांनी हिरावली तर काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडे नसते. तरीही परंपरेचे, समाजाच्या मानसिकतेचे बंध तोडत सांगलीतील पाटील कुटुंबीयांनी आपल्या मोठ्या विधवा सूनेचे लग्न आपल्याच लहान मुलाबरोबर म्हणजे सोनालीच्या दिराबरोबर केले.

सांगलीतील शांताराम नामदेव पाटील यांचा मोठा मुलगा संतोष याचे लग्न इचलकरंजी येथील दत्तात्रय निवृत्ती पाटील यांची कन्या सोनाली हिच्याशी झाले होते. लग्न झाल्यानंतर दोन वर्षातच म्हणजे 5 ऑगस्ट 2018 रोजी अल्पशा आजाराने संतोष पाटील यांचे निधन झाले.

निधनासमयी संतोषची मुलगी सहा महिन्यांची होती आणि 21 वर्षीय पत्नी सोनाली ही विधवा झाली. पदरी छोटीशी कन्या आणि मोठ्या आयुष्याची अनिश्चित भविष्याची चिंता घेऊन सोनालीची वाटचाल सुरू झाली. मुलाच्या मृत्यू बरोबरच सूनेच्या भविष्याची आणि तिच्या दुःखाची चिंता सासू राजश्री आणि सासरे शांताराम पाटील यांना वाटू लागली. सोनालीला आयुष्यभर सांभाळ करायचा निर्णय घेतला तरी घरात येणारी धाकटी सून ही सोनाली आणि तिच्या मुलीला प्रेम देईलच असं नाही. या शिवाय पुन्हा भविष्यातील या दोन्ही महिलांचे नातेसंबंध कसे राहतील याचीही चिंता त्यांना होती. आपल्या विधवा सूनेचं बाहेरील तरुणाशी लग्न करायचं म्हटलं तर तो मुलगा व्यवस्थित नांदवेल का असे अनेक प्रश्न पाटील कुटुंबीयांना सतावत होते.

सासू राजश्री आणि सासरे शांताराम पाटील पुरोगामी विचाराचे असल्याने त्यांनी सूनेचे वैधव्य दूर करण्याचा निर्णय घेतला. सूनेच्या माहेरच्या कुटुंबीयांशी बोलून पाटील कुटुंबीयांनी आपल्या विधवा सूनेचा विवाह आपल्या लहान मुलाशी लावण्याचा निर्णय घेतला आणि 24 फेब्रुवारी रोजी सोनाली पाटीलचा विवाह उमेश पाटील यांच्याबरोबर सांगलीत संपन्न झाला.

परंपरेचे बंध तोडताना सासू राजश्री पाटील यांनी समाजाचा विचार करण्यापेक्षा दोन स्त्रीच्या आयुष्याचा विचार महत्वाचा असल्याचे, सून सोनाली आणि नात रिया यांच्या भविष्याचा विचार करुण लग्नाचा निर्णय घेतला आणि लग्नही झाले.  या नात्याला माणुसकीची किनार असल्याने सांगलीतील समाजातील अनेक लोकांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे.

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.