AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येतही आदर्श सारखा घोटाळा, उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप

उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्याला संबोधित करत असताना उद्धव ठाकरे यांनी हा आरोप केला आहे. केंद्र सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली आहे.

अयोध्येतही आदर्श सारखा घोटाळा, उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप
| Updated on: Aug 10, 2024 | 9:52 PM
Share

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आम्हाला भीक नको. आम्हाला कष्टाचा पैसा पाहिजे असं शेतकरी म्हणतोय. आमचा हक्क मारून टाकला जात आहे. कोपराला गूळ लावला जात आहे. गुजरातला प्रकल्प जात होते. तेव्हा मिंधे म्हणाले, काळजी करू नका मोदी मोठा प्रकल्प देणार आहे. कुठे आहे प्रकल्प? दिला? मी दौऱ्यावर होतो. काही शेतातील महिलांना विचारलं. त्यांना विचारलं खूश आहे ना. १५०० रुपये मिळत आहेत. ती म्हणाले, १५०० रुपयात घर चालतंय. मुलांना शाळेत कसे घालू. आम्ही त्या महिलेच्या मुलाला शाळेत प्रवेश दिला. त्यांच्या शिक्षणाची सोय केली. पुस्तकांवर जीएसटी. शिक्षणावर जीएसटी. आता आयुर्विम्यावर जीएसटी लावला. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. जाहिरात आहे ना. जिंदगी के बाद भी जीएसटी लावला आहे.’

‘अयोध्येतही जमीन घोटाळा केला. आदर्श सारखा घोटाळा. आमच्या हाती घंटा. तिथे लोढाचा टॉवर. कारसेवकांचं रक्त काय लोढाचं टॉवर बांधायला दिलं होतं. सगळीकडे गुजरातचे कंत्राटदार आहेत. वाराणासीतही शंकराचार्य घरी आले होते. माझं भाग्य समजतो. त्यांनी हिंदुत्वाचा अर्थ सांगितला. जो विश्वासघात करतो तो हिंदुत्ववादी असू शकत नाही. ते संतापले होते. केदारनाथमधील ५०० किलो सोनं गायब झालं. अनेक पुराणकालीन मूर्त्या गायब झाल्या. हे तुमचं हिंदुत्व आहे. अयोध्येतील जमीन लढा खातोय, रामदेवबाबा खातोय. आपण जय श्रीराम करतो. ते केम छो म्हणत आहेत. आपल्याला भाजपमुक्त राम पाहिजे. जो नाही कामाचा तो नाही रामाचा. हे बिनकामाचे लोक आहेत. जाऊ तिथे खाऊ यालाच म्हणतात.’

‘यांची पापं उघडी करावी लागतील. सर्वांच्या यात्रा सुरू आहेत. काल दिल्लीत गेलो. तिथं लोकं भेटली. सर्व जातीपातीचे लोक भेटतात. मुस्लिम, बौद्ध, पारसी ख्रिश्चन आले. सर्व म्हणतात कोरोना काळात तुम्ही जे काम केलं ते विसरू शकत नाही. मी एकट्याने केलं नाही. तुम्ही सर्व होते. त्यामुळे महाराष्ट्र वाचला. आपण गंगेत प्रेतं वाहू दिली नाही. त्यांना वाचवलं. ही कामं लोकांना सांगा. निवडणुकीत कुणी वेडवाकडं बोललं की आपण त्यांना उत्तर देत असतो आणि कामं सांगायला जातो.’

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.