AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येतही आदर्श सारखा घोटाळा, उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप

उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्याला संबोधित करत असताना उद्धव ठाकरे यांनी हा आरोप केला आहे. केंद्र सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली आहे.

अयोध्येतही आदर्श सारखा घोटाळा, उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप
| Updated on: Aug 10, 2024 | 9:52 PM
Share

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आम्हाला भीक नको. आम्हाला कष्टाचा पैसा पाहिजे असं शेतकरी म्हणतोय. आमचा हक्क मारून टाकला जात आहे. कोपराला गूळ लावला जात आहे. गुजरातला प्रकल्प जात होते. तेव्हा मिंधे म्हणाले, काळजी करू नका मोदी मोठा प्रकल्प देणार आहे. कुठे आहे प्रकल्प? दिला? मी दौऱ्यावर होतो. काही शेतातील महिलांना विचारलं. त्यांना विचारलं खूश आहे ना. १५०० रुपये मिळत आहेत. ती म्हणाले, १५०० रुपयात घर चालतंय. मुलांना शाळेत कसे घालू. आम्ही त्या महिलेच्या मुलाला शाळेत प्रवेश दिला. त्यांच्या शिक्षणाची सोय केली. पुस्तकांवर जीएसटी. शिक्षणावर जीएसटी. आता आयुर्विम्यावर जीएसटी लावला. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. जाहिरात आहे ना. जिंदगी के बाद भी जीएसटी लावला आहे.’

‘अयोध्येतही जमीन घोटाळा केला. आदर्श सारखा घोटाळा. आमच्या हाती घंटा. तिथे लोढाचा टॉवर. कारसेवकांचं रक्त काय लोढाचं टॉवर बांधायला दिलं होतं. सगळीकडे गुजरातचे कंत्राटदार आहेत. वाराणासीतही शंकराचार्य घरी आले होते. माझं भाग्य समजतो. त्यांनी हिंदुत्वाचा अर्थ सांगितला. जो विश्वासघात करतो तो हिंदुत्ववादी असू शकत नाही. ते संतापले होते. केदारनाथमधील ५०० किलो सोनं गायब झालं. अनेक पुराणकालीन मूर्त्या गायब झाल्या. हे तुमचं हिंदुत्व आहे. अयोध्येतील जमीन लढा खातोय, रामदेवबाबा खातोय. आपण जय श्रीराम करतो. ते केम छो म्हणत आहेत. आपल्याला भाजपमुक्त राम पाहिजे. जो नाही कामाचा तो नाही रामाचा. हे बिनकामाचे लोक आहेत. जाऊ तिथे खाऊ यालाच म्हणतात.’

‘यांची पापं उघडी करावी लागतील. सर्वांच्या यात्रा सुरू आहेत. काल दिल्लीत गेलो. तिथं लोकं भेटली. सर्व जातीपातीचे लोक भेटतात. मुस्लिम, बौद्ध, पारसी ख्रिश्चन आले. सर्व म्हणतात कोरोना काळात तुम्ही जे काम केलं ते विसरू शकत नाही. मी एकट्याने केलं नाही. तुम्ही सर्व होते. त्यामुळे महाराष्ट्र वाचला. आपण गंगेत प्रेतं वाहू दिली नाही. त्यांना वाचवलं. ही कामं लोकांना सांगा. निवडणुकीत कुणी वेडवाकडं बोललं की आपण त्यांना उत्तर देत असतो आणि कामं सांगायला जातो.’

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.