AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चोर म्हटल्यावर आशिष शेलारांना राग का येतो?’ सुषमा अंधारे यांचा भर सभेत सवाल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी खेडमधील आजच्या सभेत जोरदार भाषण केलं. या भाषणाच्या वेळी त्यांनी भाजप (BJP) आणि शिवसेनेवर (Shiv Sena) सडकून टीक केली

'चोर म्हटल्यावर आशिष शेलारांना राग का येतो?' सुषमा अंधारे यांचा भर सभेत सवाल
Image Credit source: Google
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Mar 05, 2023 | 6:59 PM
Share

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी खेडमधील आजच्या सभेत जोरदार भाषण केलं. या भाषणाच्या वेळी त्यांनी भाजप (BJP) आणि शिवसेनेवर (Shiv Sena) सडकून टीक केली. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर टीका करताना चोर असा शब्दप्रयोग केलेला. पण त्यांच्या टीकेवरुन विधानसभेत त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला. याच मुद्द्याचा धागा पकडत सुषमा अंधारे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला. “संजय राऊत म्हणाले तिथे काही चोर बसले आहेत. तिथे काही चोर बसले आहेत असं ते म्हणतात तेव्हा त्या सभागृहात काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार आहेत. यापैकी कुणालाही आमदारांना राग येत नाही. तर राग आशिष शेलारांना येतो”, असं सुषमा अंधारे म्हणाले.

“आशिष शेलारांना राग येतो. अब हम इतनाही बोल रहे है की अरे भाई चोर के दाढी में तिनका है, तो जो चोर होगा वो अपनी दाढी टटोलेगा. आशिष शेलार अपनी दाढी क्यूँ टटोल रहे हैं. चोर म्हटल्यावर आशिष शेलारांना राग का येतो? हा खरा चर्चेचा विषय असला पाहिजे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

सुषमा अंधारे आणखी काय म्हणाल्या?

“विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की जे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की, आम्हाला चोर म्हटलेलं आवडलेलं नाही, त्याच आशिष शेलारांना आणि देवेंद्र फडणवीसांना एका दुसऱ्या गोष्टीचा विसर पडतोय की, त्यांच्याच पक्षाचे आमदार असणारे मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील ही सगळीच्या सगळी मंडळी जी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बरळत होती, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बेताल वक्तव्य करत होती, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंबद्दल वक्तव्य करत होती”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

“त्या सगळ्यांवर हक्कभंग तर सोडा, महापुरुषांचं अवमान होतंय म्हणून तरी किमान निंदाव्यंजक ठराव मांडणं आवश्यक होतं. पण त्यांनी तसा ठराव मांडला नाही. याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस दुटप्पी भूमिका घेतात. देवेंद्र फडणवीस आपल्या आमदारांना वाचवतात. पण जाणीवपूर्वक हक्कभंगाचा प्रस्ताव आणतात”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

Follow Us
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...