AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambernath Shivsena : शिवसेनेच्या महिला आघाडीने वाचला समस्यांचा पाढा, नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

काही ठिकाणी मोठे नाले तुंबले असून त्याचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. त्यात शहराच्या काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असून त्यामुळं रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Ambernath Shivsena : शिवसेनेच्या महिला आघाडीने वाचला समस्यांचा पाढा, नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
शिवसेनेच्या महिला आघाडीने वाचला समस्यांचा पाढाImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 06, 2022 | 9:31 PM
Share

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील नागरी समस्यांबाबत नगरपालिका (Nagarpalika) प्रशासन उदासीन असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या महिला आघाडी (Womens Lead)ने आज अंबरनाथ नगरपालिकेत धडक दिली. यावेळी अंबरनाथ शहरातील नागरी समस्यां (Civil Problems)चा पाढाच महिला आघाडीने वाचून दाखवला आणि प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरलं. पावसाळा सुरू होताच अंबरनाथ शहरात अनेक समस्यांनी डोकं वर काढलंय. अंबरनाथ शहरात सध्या अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचण्याचे प्रकार गेल्या काही दिवसात घडले असून नागरिकांच्या अक्षरशः घरात पावसाचं पाणी जातंय.

पुढील 15 दिवसात सर्व समस्या मार्गी लावण्याचं आश्वासन

काही ठिकाणी मोठे नाले तुंबले असून त्याचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. त्यात शहराच्या काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असून त्यामुळं रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या सगळ्या विरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शहर संघटक नीता परदेशी यांच्या नेतृत्त्वाखाली महिला आघाडीने अंबरनाथ नगरपालिकेत धडक दिली. यावेळी मुख्याधिकारी नसल्यानं अतिरिक्त मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांच्या दालनात जाऊन महिलांनी समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. या सगळ्यावर पुढील 15 दिवसात सर्व समस्या मार्गी लावण्याचं आश्वासन अतिरिक्त मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी दिलं.

अंबरनाथमध्ये मुख्य रस्त्यावर झाड कोसळलं

अंबरनाथमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. वेल्फेअर सेंटर ते रोटरी क्लब दरम्यानच्या रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास हे झाड कोसळलं. यामुळे रस्त्याची एक बाजू बंद झाली आहे. हा रस्ता अंबरनाथ एमआयडीसीत जाणारा मुख्य रस्ता असून वडवली परिसरातून स्टेशनला जोडणारा एकमेव रस्ता आहे. त्यामुळं झाड कोसळल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून हे झाड हटवण्याचं काम हाती घेण्यात आलंय. (Shiv Sena womens front in Ambernath accused it of ignoring civic issues)

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.