शहाजीबापूंचा आरोग्याचा मंत्र, बापूंनी 8 दिवसांत 9 किलो वजन घटवलं, कसं ते त्यांनी सांगितलं

| Updated on: Jan 02, 2023 | 6:02 PM

श्वासाच्या क्रिया झाल्यानंतर आपल्याला थकवा जाणवतो. त्यानंतर वीस मिनिटं शांत झोपायला लावतात.

शहाजीबापूंचा आरोग्याचा मंत्र, बापूंनी 8 दिवसांत 9 किलो वजन घटवलं, कसं ते त्यांनी सांगितलं
शहाजीबापू पाटील
Follow us on

सोलापूर : शिंदे गटाचे फायरब्रँड नेते शहाजीबापू पाटील यांनी 8 दिवसांत 9 किलो वजन घटवलं. त्यामुळं ते पुन्हा चर्चेत आलेत. याबाबत बोलताना शहाजीबापू म्हणाले, श्री रविशंकर यांच्या आश्रमात सुदर्शन क्रिया आणि पंचकर्म करण्यासाठी गेलो होतो. पाच दिवस त्यांनी पंचकर्माच्या क्रिया केल्या. पोट साफ करण्यासाठी प्रक्रिया केली. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे तेल अंगावर लावले. तसेच पावडर लाऊन शरीराला हलकं करून दिलं. पंचकर्म क्रिया पूर्ण झाल्यानंतर शिरोधारा केली. शिरोधारामुळं मन हलकं होतं. त्यानंतर तीन दिवस मेडिटेशन आणि सुदर्शन क्रिया केली. त्यांनी माझ्याकडून व्यायाम करून घेतला. प्राणायम करायला लावतात. सहा वेळा श्वास पोटात घ्यावा लागतो. छातीत आठ वेळा श्वास घ्यायला सांगतात. अशा काही श्वासाच्या क्रिया करून घेतात.

श्वासाच्या क्रिया झाल्यानंतर आपल्याला थकवा जाणवतो. त्यानंतर वीस मिनिटं शांत झोपायला लावतात. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सर्व अवयवांवर लक्ष केंद्रीत करायला लावतात, असं शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं.

डाव्या बाजूला लक्ष केंद्रीत करायला लावतात. ही क्रिया पूर्ण झाल्यानंतर ध्यान कसं करायचं याचं मार्गदर्शन करतात. वीस मिनिटांचं ध्यान करून घेतात. शरीर व मन शांत होतं. वजन कमी होतं. मानसिक तणाव आणि चिंता कमी होते, अशी माहिती शहाजीबापू पाटील यांनी दिली.

शहाजीबापू आधी काय झाडी काय डोंगर, या डायलॉगसाठी फेमस होते. आता ते वजन कसं कमी करायचं, यासाठी फेमस झाले. आठ दिवसांत वजन कमी करून त्यांनी आरोग्याचा आदर्श घालून दिला.