AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीसांचं नकली भांडण; प्रकाश आंबेडकरांचं विधान

Prakash Ambedkar on Manoj Jarange Patil Devendra Fadnavis : प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील भांडणावर भाष्य केलं आहे. मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीसांमधील भांडणं नकली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर...

मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीसांचं नकली भांडण; प्रकाश आंबेडकरांचं विधान
प्रकाश आंबेडकर, नेते वंचित
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jul 28, 2024 | 2:14 PM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना दिसतात. यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचं नकली भांडण आहे जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना टार्गेट केलं आहे. जरांगे यांच्या विरोधात कोणत्या देवेंद्र फडणवीस ओबीसींना वाटत आहे. देवेंद्र फडणवीस भाजपचे आहेत. मात्र ते भूमिका घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे हे नकली भांडण आहे. ते पण ठरवून झालेलं भांडण आहे. ओबीसींना फसवण्यासाठी हे चालू आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

ठाकरेंना शुभेच्छा

उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. राजकीय भूमिकेबाबत जे वास्तव आहे ते मी मांडलं आहे. मात्र त्यांनी आरक्षणाबाबत राजकीय भूमिका घेतली नाही. ती भूमिका मी मांडत आहे. उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान, मुख्यमंत्री व्हावेत. मात्र त्यांनी जरांगे पाटील यांच्या ज्वलंत मागणीवर बोलावं. महाराष्ट्रात शांत करावी यासाठी जनजागृती रॅली काढत आहोत. मराठा आणि कुणबी यांच राजकीय मतभेद मिटला असेल तर चांगला आहे. मात्र ते सामाजिक होऊ नये याची दक्षता त्यांनी घ्यावी, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

आरक्षणावर आंबेडकर काय म्हणाले?

उद्या राजकीय पक्ष म्हणून सत्तेवर आल्यानंतर तुम्हाला त्याचे तोंड द्यावे लागणार आहे. राजकीय तोंड द्यायचा असेल तर जरांगे पाटलांच्या मागणीच्या बरोबर आहात की विरोधात आहात? हे स्पष्टपणे मांडता आलं पाहिजे. हे सर्व राजकीय पक्ष ओबीसींच्या विरोधातले आहे. त्यामुळे ते पळवाटा काढत आहेत. राजकीय भूमिका घेतली तर लोकांना तो प्रश्न लवकर कळतो. आम्ही राजकीय भूमिका घेतली तर आमच्यावर ना ओबीसी नाराज आहे, ना मराठा समाज नाराज आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

आमची भूमिका प्रामाणिकपणाची आहे. जरांगेना पण भेटलो आणि हाकेही मी भेटायला गेलो होतो. जे आंदोलन करता त्या सर्वांना मी भेटत असतो. मात्र आंदोलकांना भेटल्यानंतर आमची भूमिका बदलते का किंवा नाही. हा काही इशू नाहीये. दोन ताटांची भूमिका आरक्षणाबाबत ही वंचितची संकल्पना आहे. ओबीसींच्या आरक्षणात मराठ्यांना घुसवण्यात येऊ नये ही आमची भूमिका आहे. गरीब मराठ्यांना आरक्षणाचे वेगळे ताट घ्यावे. आर्थिक निकषावर जर आरक्षण द्यायचा असेल तर त्याचे नॉम्स तुम्हाला ठरवावे लागतात, असं आंबेडकर म्हणालेत.

Follow Us
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.