
सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. द्राक्षाचा ऐन हंगामामध्ये अवकाळी झाल्याने द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंब आता हताश झाली आहेत.

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाल्याने तुटून पडलेल्या द्राक्ष दाखवताना शेतकरी.

सोलापूर जिल्ह्यातील कलिंगड, टरबूज उत्पादकांना अवकाळी पावसाने घाईला आणले आहे. त्याच प्रमाणे पपई पिकांचेही प्रचंड नुकसान झाल आहे. काढणीसाठी आलेल्या पपईची झाडांना वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे.


टरबूज पिकाल्यानंतर हातात पैसा येईल म्हणून आशेने लावलेल्या टरबूज पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने फटका बसला आहे. या अवकाळीत टरबूज पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

अवकाळी पावसाने टरबूज पिकाचे नुकसान झाल्याने त्या पिकांची हताशपणे पाहणी करताना शेतकरी.

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे एकरच्या एकर जमिनीवर लावलेल्या टरबूज पिकांचे नुकसान झाल्याने आता शेतकऱ्यांना मिळणार काय असा सवाल शेतकरी करू लागले आहेत.