AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hindu Funeral Rites: अंत्यसंस्काराच्या वेळी पाण्याने भरलेले मडकं का फोडलं जातं?

Hindu Cremation Rituals: अंत्यसंस्कार करताना काही विशेष नियमांचे पालन केले जाते, ज्यामध्ये अंत्यसंस्काराच्या आधी पाण्याने भरलेले मातीचे मडके फोडण्याचा विधी समाविष्ट आहे. चला या विधीबद्दल आणि अंत्यसंस्काराच्या वेळी तो का पाळला जातो याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया...

Hindu Funeral Rites: अंत्यसंस्काराच्या वेळी पाण्याने भरलेले मडकं का फोडलं जातं?
FuneralImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 13, 2026 | 6:53 PM
Share

हिंदू धर्मात मानवी आयुष्याशी जोडलेले 16 संस्कार सांगितले गेले आहेत. त्यातील शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. व्यक्तीच्या देहाला शेवटचा निरोप देताना हा विधी केला जातो. श्रद्धेनं आणि विधीपूर्वक केलेल्या या संस्कारामुळे आत्म्याला शांती मिळते. तसेच पुढील प्रवासासाठीचा मार्ग मोकळा होतो, अशी भावना असते. अंत्यसंस्काराच्या वेळी काही विशिष्ट नियमांचे पालन केले जाते. त्यापैकी एक महत्त्वाची प्रथा म्हणजे मुखाग्नी देण्यापूर्वी पाण्याने भरलेले मातीचे मडके फोडणे. या कृतीमागे धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. चला तर मग, या प्रथेचे महत्त्व आणि ती का पाळली जाते, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

नेमकं काय आहे कारण?

धर्मशास्त्रांनुसार, अंत्यसंस्काराच्या वेळी मृत व्यक्तीचे शरीर अग्निला अर्पण केले जाते. यालाच ‘मुखाग्नी देणे’ असे म्हणतात. मात्र त्याआधी एक विशेष विधी केला जातो. छिद्र पाडलेला मातीचा घडा पाण्याने भरून तो खांद्यावर घेतला जातो आणि चितेभोवती दक्षिण दिशेने प्रदक्षिणा घातली जाते. शेवटी एक प्रदक्षिणा घड्याळाच्या उलट दिशेने करण्याचा नियम आहे. त्यानंतर पाण्याने भरलेले मडके मागे फेकले जाते. मडके जमीनीवर आपटल्यामुळे फुटते.

त्यानंतर मृतदेहाला मुखाग्नी दिला जातो. अंत्यसंस्कारातील हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शास्त्रांनुसार, मातीचे मडके हे मृत शरीराचे प्रतीक मानले जाते. तसेच त्यामधील पाणी आत्म्याचे प्रतीक समजले जाते. प्रदक्षिणेदरम्यान मडक्यातून हळूहळू गळणारे पाणी हे शरीर आणि आत्मा यांच्यातील नाते कमकुवत होत जाऊन अखेरीस संपुष्टात येण्याचे प्रतीक मानले जाते.

मडके फोडण्यामागील धार्मिक कारण?

मडके फुटणे म्हणजे आत्म्याने शरीरापासून पूर्णपणे विलग होऊन पुढील प्रवासाला निघण्याची वेळ आल्याचे प्रतीक आहे. मानवी शरीर पंचतत्त्वांत विलीन होते, अशी श्रद्धा आहे. घडा फोडण्याची क्रिया दर्शवते की मृत व्यक्तीचे या जगातील सर्व सांसारिक संबंध आता समाप्त झाले आहेत आणि त्याने मोक्षमार्गाकडे प्रस्थान केले आहे.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!