AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईसोबतच ठाण्यात उष्णलाट, विदर्भावर सूर्य कोपला, पुढील दोन दिवसांसाठी हवामान विभागाचा काय इशारा?

Maharashtra Weather : बदलत्या वातावरणीय स्थितीमुळे राज्यात तापमानात वाढ होत आहे. मध्य भारत, उत्तर-पश्चिम राज्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात 2 ते 4 अंशाची वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे चक्कर येणे, डोके दुखणे, दम लागणे अशा रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

मुंबईसोबतच ठाण्यात उष्णलाट, विदर्भावर सूर्य कोपला, पुढील दोन दिवसांसाठी हवामान विभागाचा काय इशारा?
Maharashtra Heatwave
| Updated on: Apr 08, 2025 | 12:34 PM
Share

Maharashtra Heatwave : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. अनेक शहरांचे तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने मुंबईसोबतच ठाण्यात उष्णलाटेचा इशारा दिला आहे. राज्यात उष्ण आणि दमट वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यात विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.

मुंबई- ठाण्यात तापमान वाढले

मुंबईसह ठाणे शहराचे बाढते तापमान शहराला उष्णलाटेकडे घेऊन जात असल्याचे दिसत आहे. ठाण्याचा पारा आज विक्रमी ४२ अंशांवर पारा पोहोचला. यामुळे ठाणे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. आरोग्य विभाग उष्माघाताकडे लक्ष ठेवून आहे. तीन दिवसांपासून तापमान एका एका अंशाने वाढत आहे. सोमवारपर्यंत हा पारा तीन अंशांनी वाढून ४२ अंशावर वर पोहोचला आहे. पुढील दोन दिवसांत हे तापमान आणखी वाढू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

विदर्भात उच्चांकी तापमान

विदर्भावर सूर्य कोपला आहे. अकोल्याचे कमाल तापमान 44 अंशावर पोहोचले आहे. तापमानात सरासरीपेक्षा चार अंशांनी वाढ झाली आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान 44.2 अंश अकोला शहरात नोंदवले गेले. आता पुढील दोन दिवस विदर्भात उष्ण लाटांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील ब्रह्मपुरीमध्ये 43.8, अमरावती आणि चंद्रपूरमध्ये 43.6° तर नागपुरात 42.4 वाशीम 42.2, वर्धा 42.4, यवतमाळ 42 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

का वाढत आहे तापमान

बदलत्या वातावरणीय स्थितीमुळे राज्यात तापमानात वाढ होत आहे. मध्य भारत, उत्तर-पश्चिम राज्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात 2 ते 4 अंशाची वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे चक्कर येणे, डोके दुखणे, दम लागणे अशा रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारी गरजेशिवाय बाहेर पडू नये, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे. राज्यभरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघाताकरिता विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....