AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धाराशिवमध्ये टेम्पो-दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

धाराशिवमधून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. टेम्पो आणि दुचाकीची धडक झाली, या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे.

धाराशिवमध्ये टेम्पो-दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू
| Updated on: Feb 17, 2025 | 9:46 PM
Share

धाराशिवमधून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. टेम्पो आणि दुचाकीची धडक झाली, या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. उमरगा- लातूर रोडवरील माडजपाटी जवळ हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही, मात्र वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा- लातूर रोडवरील माडजपाटी परिसरात हा अपघात झाला आहे. टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. टेम्पो लातूरहून उमरग्याकडे येत होता. तर मोटरसायकलस्वार लातूरकडे जात होता. याच दरम्यान हा अपघात झाला. या अपघातामध्ये एकूण तिघांचा मृत्यू झाला, मृतांमध्ये एक दुचाकीस्वार तर दोन टेम्पोमधील व्यक्तींचा समावेश आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तिघांचा मृत्यू   

या अपघातामध्ये एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दुचाकीस्वार आणि टेम्पोमधील दोघांचा समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. दिगंबर कांबळे, रा. येळी तालुका उमरगा, दीपक गणू रामपुरे रा. मंगरूळ तालुका औसा आणि आकाश सूर्यकांत रामपुरे रा. मंगरूळ तालुका औसा  अशी या अपघातातील मृतांची नावं आहेत. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे, मात्र अद्याप अपघाताचं नेमकं कारण समोर आलेलं नाहीये.

वाहनांचं नुकसान

हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा चुरडा झाला आहे. वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. मृतांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दिवसेंदिवस अपघातांच्या घटना वाढतच आहेत.

Follow Us
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....