AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Patil : ऐरोली काटई टनेल 10 आणि मेट्रो 15 वर्षे डोंबिवलीत येणार नाही, या फक्त नेहमीप्रमाणेच थापा : राजू पाटील

हे बजेट सर्व समावेश असावे. महिलांसाठी काही नाही. सुतिका गृहाची इतकी चांगली जागा पडलेली असताना त्यांच्याबद्दल काही नाही. हे फक्त आकडेमोड करुन करणारे बजेट आहे. हे बघून बजेट मला समाधानकार वाटले नाही, असे पाटील म्हणाले.

Raju Patil : ऐरोली काटई टनेल 10 आणि मेट्रो 15 वर्षे डोंबिवलीत येणार नाही, या फक्त नेहमीप्रमाणेच थापा : राजू पाटील
मनसे आमदार राजू पाटील
| Edited By: | Updated on: Mar 07, 2022 | 12:07 AM
Share

कल्याण : रस्ते चंद्रासारखे आहेत आणि बजेटमध्ये तारांगण तयार करण्याच्या गोष्टी करतात. बजेट सर्व समावेश पाहिजे होते. तसे झाले नाही अशी टीका मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी नुकतीच केडीएमसी आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटवर केली आहे. इतकेच नाही तर ऐरोली काटई टनेल येणाऱ्या 10 वर्षात पूर्ण होणार नाही आणि मेट्रो 15 वर्षे डोंबिवलीत येणार डोंबिवलीत नाही हे फक्त थापा मारण्याच्या गोष्टी आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेचे बजेट (KDMC Budget) केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकतेच सादर केले. या बजेटवर मनसे आमदार राजू पाटील यांनी सडेतोड टीका केली आहे. या बजेटमध्ये आरोग्यावर आणि अन्य बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मात्र या बजेटवर मनसे आमदार राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (MNS MLA Raju Patil’s reaction on Kalyan Dombivali Municipal Corporation budget)

या बजेटमध्ये तारांगण तयार करण्याचे सांगण्यात आले आहे. रस्ते चंद्रासारखे आहेत आणि तारांगण तयार करण्याच्या गोष्टी केल्या जातात. तारांगणाची गरज आहे का आपल्याला असा सवाल उपस्थित आहे. हे बजेट सर्व समावेश असावे. महिलांसाठी काही नाही. सुतिका गृहाची इतकी चांगली जागा पडलेली असताना त्यांच्याबद्दल काही नाही. हे फक्त आकडेमोड करुन करणारे बजेट आहे. हे बघून बजेट मला समाधानकार वाटले नाही, असे पाटील म्हणाले.

प्रकल्प संदर्भात राजू पाटील यांची सत्ताधाऱ्यांवर टीका

आपल्याकडे घोषणाच होते. आपल्याकडे कुठलाच प्रकल्प येत नाही. मी लिहून देतो ऐरोली टनेल 10 वर्षे होणार नाही. मेट्रोची वाट डोंबिवलीकरांना अजून 15 वर्षे पाहावी लागेल. पब्लिक ट्रानस्पोर्टची सुधारणा होत नाही. हे फक्त नेहमीप्रमाणे थापा मारतात अशी टीका आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. अनधिकृत बांधकाम म्हणजे आयुक्त तीन महिन्यांत 20 हजार बेकायदा बांधकामे तोडणार. त्याच्यात त्यांनी प्रायोरिटी दिली होती. जे आरक्षित प्लॉट आहेत. खेळाची मैदाने असतील, रस्त्यामध्ये असलेल्या इमारती असतील. ते हटवले पाहिजे. 2016 पासून पलावा जंक्शन येथे काही अनधिकृत बांधकामे आहे. त्यांना त्यांचा मोबदला देऊन ते रस्ते खुले केले तर वाहतूक कोंडीची समस्या होणार नाही. आमदार झाल्यापासून शीळ फाटा रोडला सतत ड्राईव्ह घेत असतो त्यात सतत खीळ घातली जाते, असा आरोपही आमदार राजू पाटील यांनी केला. (MNS MLA Raju Patil’s reaction on Kalyan Dombivali Municipal Corporation budget)

इतर बातम्या

प्रत्येक पक्षात नारद असतात, त्यांना सांभाळलं तरच निवडणुका मविआ म्हणून लढू, गुलाबराव पाटील यांच्या निशाण्यावर कोण?

धारावी पुनर्वसन प्रकल्पातील 800 कोटींच्या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा, नाना पटोलेंची मागणी

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.