AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात लाथाबुक्क्यांनी मारून लिव्ह इन पार्टनरकडून महिलेची हत्या

उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा गावात सुकन्या आव्हाड ही महिला अनिल भातसोडे याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. तिच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झाल्यानं पहिल्या पतीच्या तीन मुलांसोबत ती अनिलसोबत राहात होती.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात लाथाबुक्क्यांनी मारून लिव्ह इन पार्टनरकडून महिलेची हत्या
उल्हासनगरात लाथाबुक्क्यांनी मारून लिव्ह इन पार्टनरकडून महिलेची हत्या
| Edited By: | Updated on: Mar 16, 2022 | 5:19 PM
Share

उल्हासनगर : लिव्ह इन रिलेशनशिपमधील पार्टनरनेच लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करत महिलेची हत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. सुकन्या आव्हाड असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर अनिल भातसोडे असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पतीच्या निधनानंतर एका पुरुषासोबत ही महिला लिव्ह इन रिलेशनशिप (Live in Relationship)मध्ये राहात होती. याच पुरुषाने तिला मारहाण करत तिची हत्या केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अनिल हा 12 मार्चपासून फरार झाला असून पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत. (Murder of a woman by a live-in partner in Ulhasnagar)

महिला लग्न करण्यास तयार नसल्याने केली मारहाण

उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा गावात सुकन्या आव्हाड ही महिला अनिल भातसोडे याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. तिच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झाल्यानं पहिल्या पतीच्या तीन मुलांसोबत ती अनिलसोबत राहात होती. अनिल हा तिच्याशी लग्न करण्याची मागणी करत होता. मात्र तो खूप दारू पीत असल्याने सुकन्या लग्नासाठी तयार नव्हती. दारू सोड, मगच लग्न करेन अशी अट सुकन्याने घातल्याने त्यांच्यात वाद होत होते. त्यातच 12 मार्च रोजी अनिल याने सुकन्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तिचं डोकं भिंतीवर आपटलं. यावेळी मुलगी आकांक्षा हिने आईची सुटका केली.

मात्र या मारहाणीत जखमी झाल्याने सुकन्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 15 मार्च रोजी सुकन्याचा घरातच मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलगी आकांक्षा हिने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अनिल भातसोडे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

मेळघाटात शेतात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

अमरावती जिल्ह्यातील धारणीपासून 20 किमी अंतरावर असलेल्या बिजुधावडी ते हातिदा गावादरम्यानच्या शेतात अनोळखी अंदाजे 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. धारणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मृतदेह पाहून अज्ञात व्यक्तीने या महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा आरोप होत असून पोलीस उपविभागीय अधिकारी गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे व पोलिस पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Murder of a woman by a live-in partner in Ulhasnagar)

इतर बातम्या

कल्याणमध्ये कॉन्ट्रॅक्टर हल्ला प्रकरण, व्यवसायिक वादातून दिली सुपारी, सहा आरोपी ताब्यात

Nashik News | नाशिकमध्ये दोन अपघातात 1 ठार; 2 गंभीर जखमी, treatment सुरू

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.