AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत ‘पारू’ आणि ‘देवदास’, हे तर इम्रान हाश्मींचे विचार; प्रकाश महाजन यांचा घणाघाती हल्ला

आम्ही भोंग्याविरोधातही तीव्र आंदोलन छेडणार आहोत. कितीही नोटीसा बजावा, कारवाई करा, आम्ही आंदोलन करणारच आहोत. आमचा प्रार्थनेला विरोध नाही. पण जे अजाण भोंग्यांमधून येतात ते आम्ही ऐकायचे? असा सवालही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत 'पारू' आणि 'देवदास', हे तर इम्रान हाश्मींचे विचार; प्रकाश महाजन यांचा घणाघाती हल्ला
prakash mahajanImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 23, 2023 | 1:49 PM
Share

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत घडलेल्या मुकाप्रकरणावरून मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटे काढले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत पारू आणि देवदास सिनेमे पाहायला मिळाले. हे कसले हिंदुत्वाचे विचार? हे तर इम्रान हाश्मीचे विचार आहेत, अशी घणाघाती टीका प्रकाश महाजन यांनी केली आहे. प्रकाश महाजन हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्राची धुरा देण्याची मागणीही केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात असल्याचं सांगितलं जात आहे. पण त्यांच्या रॅलीत तर पारू आणि देवदास सिनेमा पाहिला. हे का त्यांचे हिंदुत्वाचे विचार? हे तर इम्रान हाश्मीचे विचार आहेत. यांचा काय हिंदुत्वाशी संबंध? असा प्रकाश महाजन यांनी केला. तसेच एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यापासून का दूर गेले हे सर्वांना माहीत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज ठाकरे हेच हिंदूचे एकमेव नेते आहेत. त्यांचे भाषण झाल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली. त्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो. कमीत कमी कोणाचा तरी त्यांना धाक आहे, असं सांगतानाच इतके दिवस तुम्हाला माहीमचा दर्गा का दिसला नाही? संभाजीनगरमध्ये तुम्ही आम्हाला अडवलं. आम्ही संभाजीनगरला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. पण तुम्ही अडवला. आम्ही शासनाच्या निर्णयाच्या बाजूने आहोत. म्हणूच मोर्चा काढला, असंसांगतानाच राज ठाकरे यांच्या नेतृत्वामुळेच हिंदुत्व सुरक्षित वाटते. त्यामुळे त्यांच्याकडे देशाची आणि महाराष्ट्राची धुरा द्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

अतिक्रमणावर कारवाई करा

ज्ञानव्यापी मंदिरात देखील अतिक्रमणच झाले आहे. मथुरा येथील कृष्ण मंदिरात मशीद आहे. तेही अतिक्रमणच आहे. त्यावरही कारवाई केली पाहिजे. तिथली मशीद पाडली पाहिजे. हे जर करायचं असेल तर देशाचं नेतृत्व राज ठाकरे यांच्याकडेच दिलं पाहिजे, असं ते म्हणाले.

सूडाचे राजकारण सुरूय

राज ठाकरे हे स्वतःच स्वत:ची टीम आहेत. ते कुणाचीही बी टीम नाहीत. असे असते तर ते शिवसेनेतूनच बाहेर पडले नसते. आम्हाला तुमच्या टीममध्ये घ्या असा आग्रह करण्यासाठी शिवतीर्थावर अनेकजण चकरा मारत असतात, असं ते म्हणाले. गेल्या अनेक दिवसापासून सूडाचे राजकारण चालू आहे. त्यामुळे निवडणुका घ्या म्हणून मुख्यमंत्र्यांना सांगत आहोत. राज ठाकरे आता तुम्ही महाराष्ट्रकडे लक्ष द्या, असं आवाहनही त्यांनी केलं.

संजय राऊत करमणूक

यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत म्हणजे एक्सपायरी डेट औषध आहेत. राऊत हे करमणूक आहेत. त्यांचा जास्त विचार करायचा नाही. उद्धव ठाकरे यांचं नाव घ्यावच लागतं. कारण तुम्ही कामच तशी केली आहेत. इच्छा असेल तर सांगा आम्ही नाही घेणार उद्धव ठाकरे यांचं नाव, असंही ते म्हणाले.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.