AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबरनाथ एमआयडीसीतील सीईटीपी प्रकल्प अखेर 8 वर्षांनी सुरू, वालधुनी नदी केमिकलमुक्त होणार

अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत असलेला रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अखेर 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झाला आहे (Valdhuni river to be chemical free after CETP project starts in Ambernath MIDC).

अंबरनाथ एमआयडीसीतील सीईटीपी प्रकल्प अखेर 8 वर्षांनी सुरू, वालधुनी नदी केमिकलमुक्त होणार
वालधुनी नदी पुन्हा एकदा केमिकलमुक्त होणार
| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 8:22 PM
Share

अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत असलेला रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अखेर 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे आता एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांचं सांडपाणी प्रक्रिया करून थेट कल्याणच्या खाडीत जाणार आहे. त्यामुळे वालधुनी नदी रसायनमुक्त होणार आहे (Valdhuni river to be chemical free after CETP project starts in Ambernath MIDC).

दररोज 7.5 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होणार

आशिया खंडातील सर्वात मोठी एमआयडीसी अशी ओळख असलेल्या अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत एकूण 1200 पेक्षाही जास्त कंपन्या आहेत. त्यापैकी 127 बड्या रासायनिक कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये मिळून दररोज जवळपास 4 एमएलडी रासायनिक सांडपाणी तयार होतं. मात्र या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एमआयडीसीत प्रक्रिया केंद्रच नसल्यानं ते जुजबी प्रक्रिया करून वालधुनी नदीत सोडलं जात होतं. त्यामुळे वालधुनी नदीचा अक्षरशः रासायनिक नाला झाला होता. आता एका खासगी संस्थेकडून हे सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आलं असून तिथे दररोज 7.5 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

रासायनिक कंपन्यांचं उत्पादन वाढण्यास मदत होणार

महत्त्वाची बाब म्हणजे अंबरनाथ एमआयडीसीत सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद असल्यामुळे अस्तित्वातील कंपन्या आपला विस्तार करू शकत नव्हत्या. तर नव्याने येत असलेल्या 20 ते 25 कंपन्यांनाही परवानगी मिळत नव्हती. मात्र आता या नव्या कंपन्या सुद्धा अंबरनाथमध्ये येऊ शकणार असून त्यामुळे उद्योग, रोजगार, निर्यात या सगळ्यात वाढ होणार आहे.

केमिकल झोनची वार्षिक उलाढाल 20 हजार कोटींवर जाणार

अंबरनाथ एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांमधून सध्या वार्षिक 6 ते 8 हजार कोटींची उलाढाल होते. मात्र हाच आकडा आता 20 हजार कोटींवर जाईल, असा विश्वास यानंतर ऍडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी दिली आहे (Valdhuni river to be chemical free after CETP project starts in Ambernath MIDC).

हेही वाचा : पोस्ट ऑफिसच्या 7 सुपरहिट योजना; तयार करू शकता बिग बँक बॅलन्स, जाणून घ्या डिटेल माहिती

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.