AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा आताताईपणा उघड, वाद उभा राहण्याची शक्यता…

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन मोठं राजकारण रंगलेलं पाहायला मिळालेलं आहे. त्यातच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर शहराचे नाव बदलले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा आताताईपणा उघड, वाद उभा राहण्याची शक्यता...
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Dec 13, 2022 | 11:44 AM
Share

दत्ता कानवटे, औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन पुन्हा एकदा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा आताताईपणा समोर आला आहे. शिवशाही बसच्या डिजिटल बोर्डवर औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजी नगरचा उल्लेख करण्यात आला आहे. शहराच्या नावात बदल होण्याआधीच महामंडळाने शहराचं नाव बदललं आहे. शिवशाहीच्या डिजिटल बोर्डवर रंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगरचे बोर्ड झळकले आहे. दरम्यान, शिवशाही बसेसच्या डिजिटल बोर्ड मध्ये बदल करण्यात आला आहे. खरंतर मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराच्या नामांतरावर निर्णय झाला असला तरी त्यावरून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आक्षेप घेतलेला असल्याने त्यावर वाद कायम आहे. राजकीय नेत्यांमध्ये त्यावरून आजही आरोप प्रत्यारोप केले जात आहे. त्यातच आता राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसेसच्या बोर्डवर छत्रपती संभाजीनगर नावं झळकले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन मोठं राजकारण रंगलेलं पाहायला मिळालेलं आहे. त्यातच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर शहराचे नाव बदलले आहे.

औरंगाबाद शहराचे नामांतर अजून पूर्ण झालेले नाही, त्यावर आजही विरोध केला जातो आहे. औरंगाबाद हेच नावं असू द्यावे असा एक गट आहे तर दूसरा गट छत्रपती संभाजीनगर असे नाव नामांतर करावे अशी मागणी करत आहे.

औरंगाबाद शहरात येणाऱ्या शिवशाही बसच्या डिजिटल बोर्डवर छत्रपती संभाजीनगर असा आशयाचा बोर्ड झळकला आहे. त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले असून एसटी महामंडळाच्या आताताईपणावर टीका टिपणी होऊ लागली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी येत्या काळात डिजिटल बोर्डवरील मजकूर बदलला जाण्याची शक्यता आहे, अन्यथा त्यावरून कारवाईची मागणी देखील पुढे येऊ शकते, त्यामुळे शिवशाहीवरील डिजिटल बोर्ड चर्चेचा विषय ठरत आहे.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन