AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रस्ट राजकारण्यांच्या पुनर्वसनासाठी नाहीत, हायकोर्टाने साईबाबा संस्थान समिती केली बरखास्त

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने समिती नेमली होती. त्या समितीच्या नियुक्तीला स्थानिक रहिवासी उत्तमराव शेळके आणि अन्य काही भाविकांनी अधिवक्ता प्रज्ञा तळेकर यांच्यामार्फत आव्हान दिले होते.

ट्रस्ट राजकारण्यांच्या पुनर्वसनासाठी नाहीत, हायकोर्टाने साईबाबा संस्थान समिती केली बरखास्त
हायकोर्टाने साईबाबा संस्थान समिती केली बरखास्तImage Credit source: सोशल मीडिया
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Sep 14, 2022 | 1:08 AM
Share

मुंबई : देवस्थानच्या ट्रस्टवर आपले आणि आपल्या नातेवाईकांचे बस्तान बसवणाऱ्या राजकारण्यांना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालया (Mumbai High Court)ने चांगलाच दणका दिला. शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट (Shri Saibaba Sansthan Trust)ची व्यवस्थापन समिती राजकारणी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या पुनर्वसनासाठी नाही. ही ट्रस्ट सार्वजनिक कारणासाठी स्थापन करण्यात आली आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने साईबाबा संस्थान समिती बरखास्त (Dismissed) केली आहे.

न्यायालयाकडून राज्य सरकारची कानउघाडणी

यासंदर्भातील राज्य सरकारने जारी केलेली 16 सप्टेंबर 2021 ची अधिसूचना न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे. या अधिसूचनेच्या माध्यमातून राज्य सरकारने साईबाबा संस्थानसाठी व्यवस्थापन समिती नेमली होती.

आमच्या मते कोट्यवधींची संपत्ती असलेले ट्रस्ट राजकारण्यांचे पुनर्वसन करण्यासाठी नाही. जे राजकारणी सत्ताधारी पक्षाच्या जवळचे आहेत किंवा त्यांनी यापूर्वी काही निवडणुका गमावल्या आहेत. अशा राजकारण्यांसाठी या ट्रस्ट नाहीत.

परखड मत न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती एस. जी. मेहरे यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. याचवेळी संस्थान समितीसाठी करण्यात आलेल्या नेमणुका खंडपीठाने रद्दबातल ठरवल्या.

सरकारकडून न्यायालयाला अपेक्षा

आधीच्या आदेशाचा हवाला देत खंडपीठाने निर्णय दिला आहे. एकापाठोपाठ आलेल्या राज्य सरकारांनी केवळ राजकीय विचारातून श्री साईबाबा संस्थानवर नियुक्त्या केल्या आहेत.

या न्यायालयाची सरकारकडून अपेक्षा आहे की, सार्वजनिक संस्थांवर राजकीय विचार करून नियुक्ती करताना किमान देवाला तरी दूर ठेवावे, असे खंडपीठाने नमूद केले.

वर्षभरापूर्वीच्या नियुक्त्यांतून न्यायालयाच्या तत्वांची पायमल्ली

सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या नियुक्त्यांबाबत न्यायालयाने नाराजीचा सूर आळवला आहे. साईबाबा संस्थानवर नियुक्त्या करताना उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली कोणतीही तत्त्वे राज्य सरकारने विचारात घेतली नाहीत.

विश्वस्तांच्या नियुक्त्या सार्वजनिक हिताच्या कसोटीवर उतरल्या पाहिजेत. त्यात कुठेही सत्तेत असलेल्या पक्षाच्या खाजगी हितसंबंधांचा विचार करता कामा नये, असेही न्यायालयाने बजावले.

आठ आठवड्यांत नव्या नियुक्त्या करण्याचे निर्देश

उच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला आठ आठवड्यांत साईबाबा संस्थानवर नव्या नियुक्त्या करण्याचे निर्देश दिले आहेत. तोपर्यंत प्रधान जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर, जिल्हाधिकारी आणि संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांचा समावेश असलेली समिती ट्रस्टचे दैनंदिन कामकाज सांभाळेल. मात्र या समितीला कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यास न्यायालयाने मज्जाव केला आहे.

कोणत्याही पारदर्शक प्रक्रियेचा अवलंब न करता नियुक्त्या

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने समिती नेमली होती. त्या समितीच्या नियुक्तीला स्थानिक रहिवासी उत्तमराव शेळके आणि अन्य काही भाविकांनी अधिवक्ता प्रज्ञा तळेकर यांच्यामार्फत आव्हान दिले होते.

आशुतोष काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ती अनुराधा अधिक यासारख्या राजकीय व्यक्तींना कोणत्याही पारदर्शक प्रक्रियेचा अवलंब न करता समितीमध्ये घेण्यात आले, असा दावा याचिकाकर्ते शेळके व इतरांनी केला होता.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा