AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भिवंडी मनपा कम्युनिटी किचनमध्ये तांदळाची वानवा, 6 हजार कामगार दुपारी उपाशीच

भिवंडी शहरातही हजारो स्थलांतरीत परप्रांतीय मजूर/कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे (Thousands of labour are hungry in Bhivandi).

भिवंडी मनपा कम्युनिटी किचनमध्ये तांदळाची वानवा, 6 हजार कामगार दुपारी उपाशीच
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 28, 2020 | 8:22 PM
Share

ठाणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे कोरोना नियंत्रणासाठी मदत होत असली तरी दुसरीकडे उद्योग व्यवसाय बंद झाल्याने कामगारांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. भिवंडी शहरातही हजारो स्थलांतरीत परप्रांतीय मजूर/कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे (Thousands of labour are hungry in Bhivandi). त्यावर उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासनाने प्रभाग समिती निहाय कम्युनिटी किचन सुरु केले. मात्र, येथेही तांदुळच नसल्याने दुपारचे जेवणच तयार करता आले नाही. त्यामुळे तब्बल 6 हजार नागरिकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ही परिस्थिती तयार झाल्याची तक्रार 15 हजार नागरिकांना जेवण देणाऱ्या धर्मराजा ग्रुपचे प्रमुख व नगरसेवक निलेश चौधरी यांनी केली आहे.

भिवंडी या यंत्रमाग उद्योग नगरीत लाखो परप्रांतीय मजूर वास्तव्यास आहेत. सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सुरुवातीच्या 21 दिवसांच्या लॉकडाऊन कालावधीत भिवंडी शहरातील तब्बल 144 स्वयंसेवी संस्था पुढे येऊन या मजूर कामगार वर्गाच्या जेवणाची व्यवस्था केली होती. परंतु त्यानंतर पुन्हा 19 दिवसांचा लॉकडाऊन वाढल्यानंतर काही स्वयंसेवी संस्थांना जेवणाची व्यवस्था करणं अशक्य झालं. यानंतर शासनाच्या निर्देशानुसार भिवंडी महापालिका प्रशासनाने 5 प्रभाग समिती निहाय कम्युनिटी किचन सुरु करत या कामगारांना जेवण पुरवण्याचा निर्णय घेतला. परंतु आज प्रभाग समिती क्रमांक 3 अंतर्गत प्रेमाताई पाटील सभागृहात सुरु असलेल्या कम्युनिटी किचनमध्ये तांदूळच शिल्लक नसल्यानं जेवण बनू शकलं नाही. त्यामुळे या कम्युनिटी किचनवर अवलंबून असलेले तब्बल 6 हजार नागरिक दुपारच्या जेवणाला मुकले आहेत.

महापालिका प्रशासनाकडून सुरु असलेलं कम्युनिटी किचन बंद असल्याची वार्ता समजल्यावर स्थानिक नगरसेवक संतोष शेट्टी यांनी त्या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. त्यावेळी दररोज जेवणाचे पाकीट घेऊन जाणाऱ्यांनी आपली मागणी एक दिवस आधी न कळवता जेवणाची पाकिटे वाढवून नेल्याचं सांगण्यात आलं. तसेच महापालिका प्रशासन फक्त 1 दिवस पुरेल एवढंच धान्य देत असल्याचंही सांगण्यात आलं. त्यामुळे हा प्रकार झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे येथून पुढे कम्युनिटी किचनमध्ये किमान 2 दिवस पुरेल एवढे धान्य द्यावे अशी मागणी संतोष शेट्टी यांनी केली आहे.

महापालिका प्रशासन आपल्या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून मजुरांची भूक भागवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप धर्मराज ग्रुपचे प्रमुख नगरसेवक निलेश चौधरी यांनी केला आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून दररोज धान्य उपलब्ध होत आहे. परंतु सोमवारी जेवण पॅकेट अधिक गेल्याने तांदूळ कमी पडले. त्याची माहिती दिल्यानंतर दुपारी तांदूळ कम्युनिटी किचन येथे उपलब्ध झाले. सायंकाळचे 5 हजार 500 पॅकेट तयार झाले. उद्या दोन वेळी पुरेल एवढे धान्य असल्याची माहिती प्रभाग क्रमांक 3 चे सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांनी दिली आहे. परंतु एवढी गंभीर परिस्थिती असताना त्याची माहिती महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांना नव्हती याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

संबंधित बातम्या : Pune Corona Update | …तर 18 मेपर्यंत पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 9600 पोहोचण्याचा अंदाज : आयुक्त

मालेगावात दिवसभरात तब्बल 48 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 171 वर

Maharashtra Corona Live | नवी मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे 43 नवे रुग्ण

यवतमाळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 85 वर, मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या वयोवृद्धांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय

Thousands of labour are hungry in Bhivandi

Follow Us
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर